AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकशाही टिकवण्यासाठी जागृत राहा, सरकारी संस्था टिकल्या पाहिजेत : शरद पवार

बारामती : सध्या सर्वत्रच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. साधारण आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असते. मात्र वेगवेगळ्या स्वरुपात मदत करत देवस्थान संस्थांनीही या कामात हातभार लावला पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. लोकशाहीत निकाल काहीही लागला तरी संस्था टिकल्या पाहिजेत. […]

लोकशाही टिकवण्यासाठी जागृत राहा, सरकारी संस्था टिकल्या पाहिजेत : शरद पवार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

बारामती : सध्या सर्वत्रच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. साधारण आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असते. मात्र वेगवेगळ्या स्वरुपात मदत करत देवस्थान संस्थांनीही या कामात हातभार लावला पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. लोकशाहीत निकाल काहीही लागला तरी संस्था टिकल्या पाहिजेत. त्याचवेळी लोकशाही टिकवण्यासाठीही आग्रही राहिलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलंय.

जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. आणखी काही वर्षे हिच स्थिती राहिल असा अंदाज आहे. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाची असली तरी देवस्थान संस्थांनीही हातभार लावला पाहिजे. अशा काळात देवस्थानांनी शिक्षणासारखी जबाबदारी स्वीकारावी, असंही त्यांनी सांगितलं.

देवस्थानांकडे येणाऱ्या पैशांचं योग्य पद्धतीने नियोजन केलं तर त्याचा स्थानिक विकासाला फायदा होतो. आपण मुख्यमंत्री असताना राज्यातील काही देवस्थानांची सुधारणा केली. त्याचे चांगले परिणाम त्या त्या परिसरात झाले. त्यामुळेच देवस्थान ही स्थानिक विकासाला चालना देणारी ठरावीत, असं शरद पवार यांनी म्हटलं.

निवडणुकांवर चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नाही. निवडणुका येतील-जातील, पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे ही भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. सध्या देशात काय सुरुय हे आपण सर्वजण पाहतोय. लोकशाहीत काहीही निकाल लागला तरी संस्थांवर हल्ले होणार नाहीत याची जबाबदारी जागृत नागरिकांनी घेणं गरजेचं असल्याचं सांगत शरद पवार यांनी सद्यस्थितीवर मार्मिक टिप्पणी केली.

Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.