Anil Bonde | ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला स्वीकारलंय, आता कागदोपत्री मॅटर उरलाय, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य!

लोकांनी स्वीकारलंय की दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देईल, तो कार्यालयीन मॅटर आहे. लोकांच्या मनातलं लोकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चंगाल्या प्रकारे दाखवून दिलंय, असं अनिल बोंडे म्हणाले.

Anil Bonde | ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला स्वीकारलंय, आता कागदोपत्री मॅटर उरलाय, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य!
अनिल बोंडे, भाजप खासदारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 11:07 AM

नागपूरः ग्रामंपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) जनतेने भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेला कौल दिलाय. लोकांनी बहुमतानं या पॅनलच्या सदस्यांना निवडून दिलंय. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, तो कागदोपत्री असेल, असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलंय. शिवसेनेचे शिंदे गटातील लोक भाजपासोबत मैत्री करत आहेत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानेही भाजपसोबत युती केल्यास तिला अधिक बळकटी मिळेल, असंही अनिल बोंडे म्हणाले. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला आज निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करण्याची शेवटची मुदत आहे. दोन्ही गटाकडून आज दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे.

‘शिंदे -ठाकरे गटानं एकत्र यावं’

आज दोघांकडूनन पुरावे सादर केले जात आहेत. इलेक्शन कमिशनचे अधिकारी काय तो निर्णय घेतील. महाराष्ट्रातल्या जनतेनी निर्णय करून टाकलाय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एक नंबरवर भाजप राहिली आणि दोन नंबरवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिंदे शिवसेना राहिली. लोकांनी स्वीकारलंय की हा भाजप आणि दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देईल, तो कार्यालयीन मॅटर आहे. लोकांच्या मनातलं लोकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चंगाल्या प्रकारे दाखवून दिलंय.

‘भाजपसोबत असल्यानेच मजबुती’

शिवसेनेतील 12 खासदार एकनाथ शिंदे गटात आले आहेत. अजूनही काही खासदार शिंदेगटाकडे येणार अशी चर्चा आहे. यावरील प्रश्नाला उत्तर देताना अनिल बोंडे म्हणाले, आणखी किती खासदार येणार, याची सविस्तर माहिती खासदार श्रीकांत शिंदे देऊ शकतील, मात्र एक आहे की, भारतीय जनता पक्षासोबत आल्यानेच मजबुती मिळेल, याची त्यांना खात्री पटली आहे.

‘विदर्भासाठी मदत मागणार’

यंदा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे मोठं नुकसात झालंय. येथील बाधितांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचं अनिल बोंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ विदर्भात गडचिरोली, अमरावती, वर्धेत मोठं नुकसान झालंय. कोकण आणि विदर्भापर्यंत खूप नुकसान झालंय. काल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी तत्काळ एनडीआरएफची टीमही पाठवली. मात्र यावेळी एनडीआरएफची मदतच मिळून उपयोग नाही  तर पायाभूत सुविधांचं नुकसान झालंय. पूल वाहून गेलेत, जमीन खरडून गेलीय. यासाठी मदत मिळाली पाहिजे.’असं त्यांना सांगितल्याचं बोंडे म्हणाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.