AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरमध्ये भाजप खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेची उमेदवारी?

पालघर: पालघर लोकसभा  मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. पालघरच्या जागेसाठी शिवसेनेने हट्ट धरला आहे.  शिवसेनेने श्रीनिवास वनगांसाठी ही जागा मागितली असताना, आता शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. येत्या 2 दिवसात राजेंद्र गावित शिवसेनेत प्रवेश करुन, सेनेच्या तिकीटावर पालघर लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापणार […]

पालघरमध्ये भाजप खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेची उमेदवारी?
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

पालघर: पालघर लोकसभा  मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. पालघरच्या जागेसाठी शिवसेनेने हट्ट धरला आहे.  शिवसेनेने श्रीनिवास वनगांसाठी ही जागा मागितली असताना, आता शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. येत्या 2 दिवसात राजेंद्र गावित शिवसेनेत प्रवेश करुन, सेनेच्या तिकीटावर पालघर लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापणार हे जवळपास निश्चित आहे.

भाजप खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे काही महिन्यापूर्वीच पालघमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपने काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांचा विजय झाला.

आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करताना, पालघरच्या जागेचा हट्ट धरला होता. मात्र आता श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी शिवसेना राजेंद्र गावित यांनाच तिकीट देऊन, ही जागा स्वत:कडे ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

श्रीनिवास वनगांची घरवापसी?

काही दिवसांपूर्वी श्रीनिवास वनगा यांना भाजपमध्ये परत आणण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला होता. युतीतील कार्यकर्त्यांमधील नाराजी पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन न झाल्यास, याचा फटका युतीला बसू शकतो. भाजपचे दिवंगत खासदार वनगा यांच्या पुत्राची पुन्हा घरवापसी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर होतोय की काय असा कयास राजकीय तज्ज्ञांनी बांधला आहे. शिवसेनेत गेलेले श्रीनिवास वनगा यांची भाजपमध्ये घरवापसी झाली, तर युतीमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो. उमेदवार श्रीनिवास वनगा यांनाच ठेवून कमळ चिन्हावर निवडणूक झाल्यास कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर होऊ शकते. मात्र वनगा यांच्या मृत्यूनंतर भाजप जिल्हाध्यक्षपासून पदाधिकाऱ्यांनी दिलेली वागणूक वनगा कुटुंब विसरतील का हाही मोठा प्रश्न आहे. वनगा कुटुंबाची घरवापसी अशक्यच असल्याचं चित्र आहे. येत्या दोन दिवसात पालघर लोकसभेसाठी युतीचा उमेदवार कोण असेल हे ठरणार असलं तरी शिवसेनाही एकेक पाऊल रणनीती आखून उचलत आहे.

राजेंद्र गावितांची भूमिका काय?

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने ऐनवेळी काँग्रेसचे राजमंत्री राहिलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं होतं. परंतु युतीच्या जागावाटपात पालघरची जागा शिवसेनेला सोडल्याने खासदार राजेंद्र गावित पुढे काय पाऊल उचलतात हे पाहणं औत्सुकतेचे असणार आहे. राजेंद्र गावितांना बहुजन विकास आघाडीकडूनही ऑफर असल्याचं सांगण्यात येत असलं तरी गावित बहुजन विकासमध्ये सामील होतील का हे काही दिवसानंतरच कळू शकेल. दुसरीकडे शिवसेनाही वनगा कुटुंबतीलच अन्य व्यक्तीला उमेदवारी देण्याची चाचपणी करतेय का हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच समोर येऊ शकेल.

संबंधित बातम्या 

पालघरमध्ये श्रीनिवास वनगांना भाजपच्या तिकिटावर लढवण्याच्या हालचाली?   

युती, आघाडी आणि बहुजन वंचित आघाडी, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी? 

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....