AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत हा जोशी कधीपासून झाला? ‘या’ खासदाराचा सवाल

शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच जबाबदार आहेत, असा घणाघातही या खासदाराने केला.

संजय राऊत हा जोशी कधीपासून झाला? 'या' खासदाराचा सवाल
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 29, 2022 | 8:14 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणाः संजय राऊत (Sanjay Raut) हे वारंवार सरकार (Maharashtra Govt) पडेल अशी वक्तव्ये करत असतात. पण हे भविष्य सांगायला तो जोशी कधीपासून झाला, असा सवाल बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी विचारला आहे. संजय राऊत हे अशी वक्तव्य करून केवळ जनतेची करमणूक करत आहेत, अशी टीका जाधव यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर खोक्यांचा आरोप पुन्हा एकदा गेला. त्यावर खासदार जाधव म्हणाले, हे पहिल्यांदाच नाही बोलले. रोज सकाळी उठले की खोके आणि बोके हाच विषय त्यांच्याकडे उरला आहे. अतिशय नैराश्यामुळे ते असे बोलतात. त्यांच्या आरोपात तथ्य नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.

शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच जबाबदार आहेत, असा घणाघात त्यांनी केला. प्रतापराव जाधव म्हणाले, ‘ संजय राऊत यांनी छातीवर हात ठेऊन सांगावे, की खरंच तो शरद पवार यांचा निष्ठावान आहे ,की उद्धव ठाकरे यांचा .. शरद पवारांकडून सुपारी घेऊनच शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे. राहिलेली शिवसेना संपवून शरद पवार यांची शाबासकी मिळवणार आहे…

उद्धव ठाकरेंना आव्हान

खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात बुलढाण्यातून निवडणूक लढवावी. आम्ही तर शिवसेनेवर लढणार, भाजपा हा मित्रपक्ष असून पुढील निवडणूक आम्ही सोबतच लढणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मशालीने गद्दारांचे घर जाळल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर खासदार जाधव म्हणाले, ‘ तुमचे घर अगोदर  सांभाळा.. मग दुसऱ्याचे घर जळायचा विषय तुम्ही करा.. ज्यांचे घर काचाचे त्यांनी दुसऱ्याच्या घराला दगड मारायची नसतात.. यांचे पूर्ण घर पांगलेले आहे.. दररोज अनेक लोक आमच्यात सहभागी होतात . नैराश्य पोटी असल्याने केलेले हे विधान आहे ..

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन