AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, कुणी पलायन केलं तरी पक्षाला फरक पडत नाही : चंद्रकांत पाटील

भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (17 नोव्हेंबर) चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. मात्र, पक्षातून कुणी पलायन केलं तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली (Chandrakant Patil on Jaysingrao Gaikwad resign from BJP).

आम्ही विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, कुणी पलायन केलं तरी पक्षाला फरक पडत नाही : चंद्रकांत पाटील
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 18, 2020 | 3:56 PM
Share

पुणे : “विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या सर्व जागा आम्ही जिंकणार”, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दरम्यान, मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (17 नोव्हेंबर) चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. मात्र, “पक्षातून कुणी पलायन केलं तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली (Chandrakant Patil on Jaysingrao Gaikwad resign from BJP).

“कोण पलायन करतं आणि काम करतं यावर भाजप चालत नाही. वर्षानुवर्ष जे लोक पक्षात आहेत ते पूर्ण ताकदीने पक्ष पुढे नेत असतात. कुणीतरी एकाने पलायन केलं तर त्याचा फारसा काही परिणाम होईल, असं मला वाटत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil on Jaysingrao Gaikwad resign from BJP).

“आम्ही विधान परिषदेच्या सर्व जागा काढणार. नागपूर आणि पुण्याला आमचे सिटिंग आहेत. मराठवाडा पदवीधर यावेळी आम्ही काढणार. पुणे शिक्षक ही जागा आमची 2008 ला होती, 2014 ला गेली. पण ती सीट यावेळी काढणार. नव्याने आम्ही अमरावती शिक्षण मतदारसंघाची जागा काढणार”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर तर आमचे उमेदवार सिटिंगच होते. धुळे महापालिका, धुळे जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे धुळे जिंकण्यात काही अडचण नाही. सहा जागा आम्ही काढणार. गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारचा गोंधळ चालला आहे त्यावर पहिल्यांदा लोकांना मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. लोक यांच्याविरोधात मत व्यक्त करणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. “राज्य सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ नाही. सरकार हे कुटुंब चालवण्यासारखं टीमवर्कने समूह भावनेने चालवायचं असतं. फक्त एकच विषय नाही, तर मराठा आरक्षणापासून अनेक विषय आहेत. प्रत्येक विषयाबाबत सरकारमधील एक मंत्री एक बोलतो तर दुसरा काहितरी वेगळं म्हणतो. मराठा आरक्षणाबाबत गोंधळ आहे. शाळा उघडण्याबाबत एकाने म्हणायचं शाळा दिवाळीनंतर उघडणार तर दुसरा म्हणतो एवढ्या लवकर उघडणार नाही. सगळ्याच विषयांमध्ये मंत्र्यांमध्ये जो ताळमेळ नाही. एखादी घोषणा करण्याआधी त्याची सर्व पूर्व तयारी झाली पाहिजे. ती पूर्वतयारी नसते”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

“शेतकऱ्यांना 10 हजार हेक्टरची घोषणा झाली. मुळात 25 ते 50 हजार हेक्टर मदतीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा होती. त्याचे निम्मे पैसे दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा झाली. पण निम्मे पैसे आलेच नाहीत”, असंदेखील पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार

मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाचा राजीनामा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…