AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रशेखर आजाद यांची निवडणुकीतून माघार, काँग्रेसला पाठिंबा

वाराणसी : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून मैदानात उतरलेल्या भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भीम आर्मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे वाराणसीतील दलित मतांची विभागणी होत होती. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे असे चंद्रशेखर आजाद यांनी जाहीर केले आहे. वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी […]

चंद्रशेखर आजाद यांची निवडणुकीतून माघार, काँग्रेसला पाठिंबा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

वाराणसी : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून मैदानात उतरलेल्या भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भीम आर्मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे वाराणसीतील दलित मतांची विभागणी होत होती. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे असे चंद्रशेखर आजाद यांनी जाहीर केले आहे.

वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनीही वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र आज बुधवारी त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

भीम आर्मीने वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करताच अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. मात्र याचा फायदा काही विरोधीपक्ष घेत असल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच भीम आर्मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने वाराणसीतील दलित मतांची विभागणी होत आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत आहे. असे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी सांगितले. तसेच निवडणुकीत भीम आर्मीने काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांनी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला नसल्याचे जाहीर केले आहे.

तसेच येत्या काही दिवसात चंद्रशेखर आजाद दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना भेटण्यास दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत भीम आर्मीकडून आम आदमी पार्टीला (आप) पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान येत्या 26 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर भाजप नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींचा अर्ज दाखल करतेवेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी तमिळनाडूतील काही शेतकरीही नरेंद्र मोदींच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यादेखील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाराणसी लोकसभा मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली