AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच छगन भुजबळ यांचा हल्ला, वेगळा निर्णय का घेतला?; भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे. ओबीसी समाज आवश्यक आहे. दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आवश्यक आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच छगन भुजबळ यांचा हल्ला, वेगळा निर्णय का घेतला?; भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2023 | 1:20 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाव न घेता टीका केली. तसेच वेगळा निर्णय का घेतला? याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली. कायदे आम्हालाही कळतात. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काही कसे करू? आम्ही पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला. सकाळी उठलो आणि निर्णय घेतला आहे असं झालं नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच 2014ला स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? अजित पवार यांनी पहाटे शपथविधी का घेतला? त्याच्यामागे कोण होतं? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

वांद्रे येथील एमईटी मैदानावर अजित पवार गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ बोलत आहेत. यावेळी भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित करत आपल्याच नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. शॉर्ट नोटीसवर सात आठ हजार लोक उपस्थित आहे. 40 हून अधिक आमदारांचं आम्हाला समर्थन आहे. काही आमदार वाटेत आहेत. नव्या दमाने राष्ट्रवादी पक्ष मजबुतीने वाटचाल करणार आहे. काल काही नियुक्त्या झाल्या. परवा काही नियुक्त्या झाल्या. येत्या काही दिवसात अनेक नियुक्त्या होतील, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

जयंत पाटलांवर टीका

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. महिला अध्यक्षांच्या निवडणुका नाही. दोन दोन चार चार महिने सांगूनही नियुक्त्या झाल्या नाही. शरद पवार यांनी सांगूनही नियुक्त्या होत नव्हत्या. युवक काँग्रेस असो की महिला काँग्रेस असेल तर त्याला नेतृत्व दिल्यावरच काम सुरू होतं. हे सर्व काम थांबलं होतं. सांगूनही काम होत नव्हतं. दादांनी सांगितलं हे काम होत नसेल तर पक्षाची जबाबदारी मी घेतो. दुसऱ्या दिवशी मी सांगितलं. पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे. ओबीसी समाज आवश्यक आहे. दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आवश्यक आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं. सर्व समाजाला घेऊन पक्ष जात आहे हे चित्र निर्माण व्हायला हवं होतं ते झालं नाही, असं म्हणत भुजबळ यांनी थेट जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवला.

घाईघाईने ठरलं नाही

काही महिन्यांपासून वेगळा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 1999मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. महाराष्ट्राचं अध्यक्षपद माझ्याकडे होते. समीर, पंकज त्यांचे सहकारी राबत होते. शिवाजी पार्कवर सभा होती. या सर्वांचं नियोजन त्यांनी केलं होतं. आज जेव्हा परत एकदा पक्षाला भरारी घ्यायची आहे, त्यावेळी सर्व मंडळी झोपलेली नाही. घाईघाईने ठरलं आणि सर्व व्यवस्था झाली असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....