AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच छगन भुजबळ यांचा हल्ला, वेगळा निर्णय का घेतला?; भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे. ओबीसी समाज आवश्यक आहे. दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आवश्यक आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच छगन भुजबळ यांचा हल्ला, वेगळा निर्णय का घेतला?; भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2023 | 1:20 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाव न घेता टीका केली. तसेच वेगळा निर्णय का घेतला? याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली. कायदे आम्हालाही कळतात. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काही कसे करू? आम्ही पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला. सकाळी उठलो आणि निर्णय घेतला आहे असं झालं नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच 2014ला स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? अजित पवार यांनी पहाटे शपथविधी का घेतला? त्याच्यामागे कोण होतं? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

वांद्रे येथील एमईटी मैदानावर अजित पवार गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ बोलत आहेत. यावेळी भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित करत आपल्याच नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. शॉर्ट नोटीसवर सात आठ हजार लोक उपस्थित आहे. 40 हून अधिक आमदारांचं आम्हाला समर्थन आहे. काही आमदार वाटेत आहेत. नव्या दमाने राष्ट्रवादी पक्ष मजबुतीने वाटचाल करणार आहे. काल काही नियुक्त्या झाल्या. परवा काही नियुक्त्या झाल्या. येत्या काही दिवसात अनेक नियुक्त्या होतील, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

जयंत पाटलांवर टीका

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. महिला अध्यक्षांच्या निवडणुका नाही. दोन दोन चार चार महिने सांगूनही नियुक्त्या झाल्या नाही. शरद पवार यांनी सांगूनही नियुक्त्या होत नव्हत्या. युवक काँग्रेस असो की महिला काँग्रेस असेल तर त्याला नेतृत्व दिल्यावरच काम सुरू होतं. हे सर्व काम थांबलं होतं. सांगूनही काम होत नव्हतं. दादांनी सांगितलं हे काम होत नसेल तर पक्षाची जबाबदारी मी घेतो. दुसऱ्या दिवशी मी सांगितलं. पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे. ओबीसी समाज आवश्यक आहे. दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आवश्यक आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं. सर्व समाजाला घेऊन पक्ष जात आहे हे चित्र निर्माण व्हायला हवं होतं ते झालं नाही, असं म्हणत भुजबळ यांनी थेट जयंत पाटील यांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवला.

घाईघाईने ठरलं नाही

काही महिन्यांपासून वेगळा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 1999मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. महाराष्ट्राचं अध्यक्षपद माझ्याकडे होते. समीर, पंकज त्यांचे सहकारी राबत होते. शिवाजी पार्कवर सभा होती. या सर्वांचं नियोजन त्यांनी केलं होतं. आज जेव्हा परत एकदा पक्षाला भरारी घ्यायची आहे, त्यावेळी सर्व मंडळी झोपलेली नाही. घाईघाईने ठरलं आणि सर्व व्यवस्था झाली असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.