AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde : ‘अरे बाबा थांब जरा’ मध्यरात्री झालेल्या सत्कारानंतरच्या भाषणात एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

Eknath Shinde Dadar Speech : संजय शिरसाट यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

CM Eknath Shinde : 'अरे बाबा थांब जरा' मध्यरात्री झालेल्या सत्कारानंतरच्या भाषणात एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 6:40 AM
Share

मुंबई : गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. दादरच्या (Dadar) रविंद्र नाट्य मंदिर येथे हा सत्कार सोहळा पार पडला. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. रात्री एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी बंडखोरी दरम्यान, नेमकं काय काय घडलं, यावर भाष्य केलंय. मध्यरात्री असा मेळावा कुणी घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. जे काही चाललं, त्यात संजय शिरसाट पुढे होते, असंही ते म्हणाले. दरम्यान, एकानाथ शिंदे यांना भेटायला आलेल्या दिव्यांग व्यक्तीला स्टेजवर बोलवून त्यांचाही सन्मान करण्यात आला.

‘अरे बाबा थांब जरा’

संजय शिरसाट नेमकी विचारायचे, साहेब कधी करणार, काय कराचंय, पण मी बोललो बाबा थांब जरा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोरीच्या रणनितीबाबत भाष्य केलंय. सहा महिन्यात चित्र बदलत गेलं. चित्र घातक होत होतं, असं ते म्हणाले. आम्ही खूप प्रयत्न केले होते, पण काहीच झालं नाही, असंही त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस सगळीकडेच आमदारकीची तयारी करते, हे आम्हाला लक्षात आलं. पण आमदारांना निधी मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केला. शिवसेना चार नंबरवर गेली. आम्ही हिंदुत्वाचा झेंडा फडकवल्यावर तुम्ही कॅबिनेटमध्ये नामांतराचा निर्णय घेतला, असं म्हणत शिंदेंनी हल्लाबोल केला. शिवसेना वाचवण्यासाठी ही क्रांती आहे असंही ते म्हणाले.

सगळं ओके वाटतंय!

दरम्यान, मी संजय शिरसाट यांना विचारतो, की तुम्ही मुंबईत असता, मग मतदारसंघात काय करायचं? पण ते बोलले की मतदारसंघ ओके आहे. आता पाहिलं तर खरंच एकदम ओके वाटतंय, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची स्तुती केली. तसंच शहाजी बापू सारख्या लोकांच्या कला गुणांना वाव देण्याचं काम केल्याचंही शिंदे म्हणाले. आत्मपरिक्षण करायचं सोडून आम्ही कसे बंडखोर आहोत, हे सांगण्यात आल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी खंत व्यक्त केली. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सकाळी टीव्हीवर बोलणाऱ्यांनी हे बघावं जरा, असं म्हणत संजय राऊतांनाही एकनाथ शिंदे यांनी डिवचलं कोर्टात चार मागण्या केल्या आणि म्हणतात कोर्टात आमचा विजय झाला, असंही ते शिंदे म्हणाले. कोर्टानं त्यांचं म्हणणं फेटाळल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.