AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde | ‘पुढच्या आठवड्यात कशाला, लवकरच…’ मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदेंचं सूचक वक्तव्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालही दिल्लीत हजर!

महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत राज्यातील सर्व खात्यांचा कारभार, त्या त्या विभागातील सचिवांकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी यासंबंधातील निर्णय दिला.

CM Eknath Shinde | 'पुढच्या आठवड्यात कशाला, लवकरच...' मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदेंचं सूचक वक्तव्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालही दिल्लीत हजर!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखलImage Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Aug 06, 2022 | 1:35 PM
Share

नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत पोहोचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. काही शासकीय कामांसाठी या दोघांचा दिल्ली दौरा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज आणि उद्या हे दोन्ही नेते दिल्लीत असतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम चर्चा होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यानंतर सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करण्यात येईल, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे दिल्लीत आज आणि उद्या होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

मुख्यमंत्री शिंदेंची सहावी दिल्ली वारी

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची सहावी दिल्ली वारी आहे. मात्र या दौऱ्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नावांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण शिंदे-भाजप सरकार अस्तित्वा होऊन एक महिना उलटून गेलाय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. असंख्या कामे, विकासकामं प्रलंबित आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार न होणं, अयोग्य असल्याची टीका विरोधकांकडून होतेय. शिंदे सरकारची खिल्लीही उडवली जातेय. मंत्रिमंडळ विस्ताराअभावी पावसाळी अधिवेशनही लांबलंय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन होणं आवश्यक आहे. येत्या काही दिवसातच नव्या मंत्र्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

आज, उद्या शासकीय बैठका

शनिवार आणि रविवारी नवी दिल्लीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल दाखल होत आहेत. आज दुपारी साडे चार वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक राष्ट्रपती भवनात होणार आहे. तसेच उद्या नीती आयोगाचीदेखील बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीसांसह महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे या बैठकीला हजर राहतील. या दोन दिवसांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

तात्पुरते खात्यांचे अधिकार सचिवांकडे…

दरम्यान, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत राज्यातील सर्व खात्यांचा कारभार, त्या त्या विभागातील सचिवांकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी यासंबंधातील निर्णय दिला. राज्यात महिनाभरापासून कॅबिनेट मंत्री नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणची कामं प्रलंबित आहेत. त्या त्या विभागातील कामांवर निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले आहेत. मात्र मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?