AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही?, दिल्लीने धाकधूक वाढवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त एवढंच म्हणाले…

महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे, असं बोललं जात होतं. आता याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही?, दिल्लीने धाकधूक वाढवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त एवढंच म्हणाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
| Updated on: Jul 17, 2024 | 2:56 PM
Share

Eknath Shinde on cabinet expansion : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन सध्या राजकारण सुरु आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे, अशा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली होती. आता याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या पंढरपुरात आहे. पंढरपुरात आज अनेक लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यांचे आयोजन करण्यता आले आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी जास्त लोक वारीत सहभागी झाले आहेत. चांगला पाऊस पडलाय, पेरण्या झाल्यात. आणखी पांडुरंगाला सांगितलंय, बळीराजाला चांगले दिवस आणं. त्याच्यावरील संकट दूर कर. शेतकरी, वारकरी, कष्टकरी, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि ज्येष्ठांना आशीर्वाद दे. त्यांच्या जीवनात सुख समृद्धी दे, असे साकडं पांडुरंगाला घातलं”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल”

यावेळी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच स्पष्टपणे उत्तर दिले. “मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं काहीच नाही, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय होईल, तुम्हाला लवकरच याबद्दलची बातमी देईन”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

…तर आमदार नाराज होतील, संजय शिरसाठ यांचे वक्तव्य

तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनीही भाष्य केले. “संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा अनेक आमदार नाराज होतील. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी काय हरकत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”, असे संजय शिरसाठ यांनी म्हटले.

मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची सूत्रांची माहिती

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. पण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही, अशा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगल्याचे बोललं जात होतं. मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक नेते इच्छुक असल्याची माहितीही समोर आली होती. परंतु दिल्ली भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडून याबद्दल एक मोठा निर्णय जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार