AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाला कोणतं खातं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खातेवाटपाच्या मुहूर्ताची घोषणा

मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच कुणाला कोणतं मंत्रालय मिळणार याचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ही खाते निश्चिती कधी होणार याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली (Uddhav Thackeray declare Portfolio allocation date).

कुणाला कोणतं खातं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खातेवाटपाच्या मुहूर्ताची घोषणा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 01, 2019 | 11:09 PM
Share

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. मात्र, अद्यापही कुणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी येणार याविषयीची घोषणा बाकी आहे (Uddhav Thackeray declare Portfolio allocation date). मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच कुणाला कोणतं मंत्रालय मिळणार याचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ही खाते निश्चिती कधी होणार याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली (Uddhav Thackeray declare Portfolio allocation date).

उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या आम्ही सातही लोक एकत्रितपणे काम करत आहोत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अजूनही खातेवाटप झालं नाही मग काय, असं काहीही नाही. आम्ही सध्या सर्व खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यात कुठेही अडथळा निर्माण होत नाही. खातेवाटपाचा निर्णय आम्ही पुढील एक ते दोन दिवसात (2 किंवा 3 डिसेंबरपर्यंत) करणार आहोत.”

मंत्रिमंडळाने कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या परिस्थितीची सर्व माहिती घेतली जात आहे. प्राथमिक बैठक आज (1 डिसेंबर) झाली. आणखी काही बैठका होऊन राज्याच्या स्थितीचं चित्र आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट होईल. त्यानंतर आम्ही ठरवल्याप्रमाणे सर्व निर्णय घेऊ, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

“आरेप्रकरणी आंदोलन करणाऱ्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश”

उद्धव ठाकरे यांनी आरेतील झाडांच्या कत्तलीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “आरेतील झाडांची कत्तल झाली तेव्हा अनेक पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केलं. त्यानंतर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. ते सर्व गुन्हे आज मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणासाठी पर्यावरणप्रेमींनी जाकरुक असणं गरजेचं आहे. सरकारला त्यांची देखील उद्याच्या विकासात मदत हवी आहे.”

Follow Us
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार