AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, मंदिरे सुरु करण्याच्या भाजपच्या दबावाला पडले नाहीत: प्रताप सरनाईक

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरे कधी उघडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. | Temples in Maharashtra

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, मंदिरे सुरु करण्याच्या भाजपच्या दबावाला पडले नाहीत: प्रताप सरनाईक
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 14, 2020 | 4:01 PM
Share

मुंबई: कोरोनाचा धोका असतानाही राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपकडून मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र, या दबावाला उद्धव ठाकरे बळी पडले नाहीत. वेळ आल्यावर टप्याटप्याने मी सर्वकाही सुरु करेन, हा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला. याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने उद्धव ठाकरे यांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. (Temples in Maharashtra will be open from Diwali Padwa 2020 announcement by CM Uddhav Thackeray)

भाजपकडून सातत्याने सरकारवर दबाव आणला जात होता. पण उद्धव ठाकरे यांनी ‘जनता हाच माझा ठेव, हाच माझा विठ्ठल’, हे ब्रीद पाळून त्यांचे रक्षण केले. परिस्थिती पाहून टप्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरु करेन, हे उद्धव ठाकरे यांनी अगोदरच सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी जिम, हॉटेल आणि रेस्टॉरंट टप्प्याटप्याने सुरु केली. आता लोकल ट्रेन सुरु करण्याचीही परवानगी राज्य सरकारने मागितली आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्यात येत असल्याची घोषणा केली. मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे त्यांनी नागरिकांना सांगितले.

इगोपोटी निर्णय रखडवला, मंदिरं उघडणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण : प्रवीण दरेकर ठाकरे सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय इगोपोटी रखडवला असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सरकारनं हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र केवळ भाजप आंदोलकांना, पुजाऱ्यांना वारकऱ्यांना सपोर्ट करते, मग अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, इगोपोटी हा निर्णय रखडवला होता, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली.

संबंधित बातम्या:

ही ‘श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट!

(Temples in Maharashtra will be open from Diwali Padwa 2020 announcement by CM Uddhav Thackeray)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक