AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आरे, नाणार आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांनंतर आता मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत (Uddhav Thackeray on Maratha Morcha and Farmer Strike cases).

मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 04, 2019 | 10:51 PM
Share

मुंबई : आरे, नाणार आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांनंतर आता मराठा आंदोलन आणि शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यांचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत (Uddhav Thackeray on Maratha Morcha and Farmer Strike cases). कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे या निर्णयाची माहिती दिली. ते कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोणत्याही निरपराध व्यक्तिविरोधात कारवाई होणार नाही, असं आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं (Uddhav Thackeray on Maratha Morcha and Farmer Strike cases).

एकनाथ शिंदे म्हणाले, “मागील 5 वर्षात झालेल्या नाणार आंदोलन, शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन अशा सर्वच आंदोलनांमधील गुन्ह्यांचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. या बैठकीत आधी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची आणि त्यातील अडथळ्यांची माहिती घेण्यात आली. मी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत निर्देशही दिले आहेत. निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही.”

मराठा आंदोलनातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल. त्यानंतर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय होईल, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

“आकसाने कोणतीही कारवाई होणार नाही”

एकनाथ शिंदे यांनी आकसाने कोणतीही कारवाई होणार नाही, असंही आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले, “बैठकीत विकास प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याला गती देण्याबाबत चर्चा झाली. नवे मुख्यमंत्री आल्यानंतर प्रकल्पांची माहिती घेणे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या सद्यस्थितीचीही माहिती घेतली आहे. आकसाने कोणतीही कारवाई होणार नाही. राज्याच्या हितासाठी जे करावं लागेल ते करण्याची चर्चा कॅबिनेटमध्ये झाली.”

अवकाळी पावसाने झालेले नुकसान, कर्जमुक्ती असेल यावरही चर्चा झाली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी जे करणं शक्य आहे ते केलं जाईल, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं.

Follow Us
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ