AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची नववी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 4 उमेदवार घोषित

Loksabha Election 2019 : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी नववी यादी जाहीर केली असून, या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावं आहेत. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आता उत्तर मुंबई  आणि पुणे या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्याचे बाकी आहे. काँग्रेसच्या नवव्या यादीतील चार उमेदवार […]

काँग्रेसची नववी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 4 उमेदवार घोषित
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

Loksabha Election 2019 : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी नववी यादी जाहीर केली असून, या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावं आहेत. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आता उत्तर मुंबई  आणि पुणे या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्याचे बाकी आहे.

काँग्रेसच्या नवव्या यादीतील चार उमेदवार :

  1. अकोला – हिदायत पटेल
  2. रामटेक – किशोर उत्तमराव गजभिये
  3. चंद्रपूर – सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर
  4. हिंगोली – सुभाष वानखेडे

चंद्रपुरातून बांगडेंऐवजी बाळू धानोरकर लढणार

चंद्रपुरात काँग्रेसने विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगेड यांच्याबाबत नाराजी व्यक्त करुन, धानोरकरांना उमेदवारी देण्याबाबत मागणी केली होती. ती मागणी काँग्रेसच्या वरिष्ठांनी मान्य करुन, बाळू धानोरकर यांना नवव्या यादीत स्थान दिले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून चंद्रपुरातून आता बाळू धानोरकर हेच लढतील.

काँग्रेसचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार

  1. नंदुरबार – के. सी. पाडवी
  2. धुळे – कुणाल पाटील
  3. वर्धा – चारुलता टोकस
  4. यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे
  5. मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड
  6. शिर्डी – भाऊसाहेब कांबळे
  7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर
  8. नागपूर – नाना पटोले
  9. गडचिरोली – नामदेव उसेंडी
  10. मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त
  11. मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा
  12. सोलापूर – सुशील कुमार शिंदे
  13. जालना : विलास औताडे
  14. भिवंडी : सुरेश टावरे
  15. औरंगाबाद : सुभाष झांबड
  16. लातूर : मच्छिंद्र कामत
  17. नांदेड : अशोक चव्हाण
  18. अकोला – हिदायत पटेल
  19. रामटेक – किशोर उत्तमराव गजभिये
  20. चंद्रपूर – सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर
  21. हिंगोली – सुभाष वानखेडे

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.