AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वेदांता’ कोणामुळे राज्याबाहेर गेला?, लोंढे म्हणतात फडणवीसांनी खोटं बोलू नये तर देसाई म्हणतात तत्कालीन जलसंपदा मंत्री…

वेदांतावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना दिसत आहे. वेंदाता राज्याबाहेर जाण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे.

'वेदांता' कोणामुळे राज्याबाहेर गेला?, लोंढे म्हणतात फडणवीसांनी खोटं बोलू नये तर देसाई म्हणतात तत्कालीन जलसंपदा मंत्री...
Image Credit source: tv9
| Updated on: Nov 02, 2022 | 3:08 PM
Share

मुंबई : वेदांतावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना दिसत आहे. वेंदाता राज्याबाहेर जाण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. तर महाविकास आघाडीमुळेच वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर कोणामुळे गेला यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी खोटं न बोलता राज्यात गुंतवणूक आणावी असं लोंढे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मात्र तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांमुळेच प्रकल्प गेल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

अतुल लोंढे नेमकं कय म्हणाले?

वेदातांवरून अतुल लोंढे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आरटीआयमध्ये माहिती मागितली जाते, आणि ती माहिती संध्याकाळी मिळते सुद्धा, आम्हाला तीस – तीस दिवस माहिती मिळत नाही. माहिती उपलब्ध नाही, या माहितीचा या विभागाशी संबंध नाही अशी कारणे दिली जातात. काल पण खोटं बोलले आणि आज पण पुन्हा एकदा खोटं बोलले. त्यांना आठवत नाही आपण मागे काय बोललो होतो त्यामुळे पुन्हा एकदा ते खोटे बोलले आहेत.  महाराष्ट्र आपला आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आपले आहेत. इथे क्रेडिट  घेणं राजकारण करणं योग्य नाही. खोट न बोलता रोजगार आणला तर विरोधी पक्षदेखील तुमच्यासोबत आहे, असं म्हणत लोंढे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

शंभूराज देसाई यांनी काय म्हटलं?

तर दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र वेदांता प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी विरोधकच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांमुळेच प्रकल्प गेल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.