AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking : प्रभू श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर यात्रा करणारे राहुल गांधी चौथे: नाना पटोले

कोरोनाच्या काळात साधूंना मारलं असा भाजपने गवगवा केला. आता भाजपचे गृहमंत्री आहेत. स्वत:ला हिंदुसम्राट म्हणून घेणारे सत्तेत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. सांगलीत झालेल्या घटनेचा निषेध करतोय, असं त्यांनी सांगितलं.

Breaking : प्रभू श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर यात्रा करणारे राहुल गांधी चौथे: नाना पटोले
कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 14, 2022 | 12:55 PM
Share

नागपूर: भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर यात्रा केली. त्यानंतर ही यात्रा करणारे राहुल गांधी (rahul gandhi) हे चौथे आहेत, असं सांगतानाच राहुल गांधी यांना हिंदुत्वाबाबत (hindu) प्रमाणपत्र देणारे कोण?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची यांची योग्यता नाही. ते धर्माचं काम करतायत. राहुल गांधी यांच्या टी शर्टची चर्चा केली जाते. तेव्हा शहा यांच्या मफलरची आणि मोदी यांच्या सुटाबुटाची चर्चा होतेय, असा हल्लाबोलही नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले हे मीडियाशी संवाद साधत होते. वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने त्यावरून राजकारण सुरू झालं आहे. त्यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला हवं. पण ते मोदी-शहा म्हणतात तसं ऐकतात. आपल्या राज्यातलं पाणी गुजरातला पाठवलं. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहीला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रातील भाजप नेते हे करतायत, असा आरोप करतानाच उद्या मुंबईत गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको, असं नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्राला लुटून गुजरातकडे पाठवलं जातंय. जी कंपनी गेली त्यामुळे लाखो लोकांना इथे रोजगार मिळणार होता. अशा मोठ्या कंपन्यांना गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. गेलेली कंपनी महाराष्ट्रात परत यायला पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली.

राहुल गांधी यांची यात्रा सुरू झाली तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता सुरु झाली आहे. तेव्हापासून काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत धेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकशाही विकत घेण्याचं काम भाजप करत आहे , असं सांगतानाच गोव्याबाबत मला काहीही माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या काळात साधूंना मारलं असा भाजपने गवगवा केला. आता भाजपचे गृहमंत्री आहेत. स्वत:ला हिंदुसम्राट म्हणून घेणारे सत्तेत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. सांगलीत झालेल्या घटनेचा निषेध करतोय, असं त्यांनी सांगितलं.

देशात लोकशाही राहीली नाही, स्वत:च्या मस्तीसाठी केंद्र आणि राज्यातील सरकार चाललंय. मुख्यमंत्री – पंतप्रधान यांच्याशी बोलले. आता पीएम मुख्यमंत्र्यांना मान देतात की काय हे कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.