AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satyajit Tambe : सरकार बेरोजगारांची थट्टा करतय; गोविंदाच्या आरक्षणावरून सत्यजित तांबेंचा निशाणा

सध्या गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्यावर आता विविध संघटना आणि विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

Satyajit Tambe : सरकार बेरोजगारांची थट्टा करतय; गोविंदाच्या आरक्षणावरून सत्यजित तांबेंचा निशाणा
सत्यजित तांबे
| Updated on: Aug 20, 2022 | 11:19 AM
Share

मुंबई : सध्या गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्यावर आता विविध संघटना आणि विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर युवककाँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने दहिहंडीचा समावेश हा खेळात केला याबाबत काहीच आक्षेप नाही. मात्र गोविंदाना शासकीय नोकरीत (Govt job) आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे  देश आणि राज्यातील बेरोजगारांची सरकारने केलेली चेष्टा असल्याचा घणाघात सत्यजीत तांबे यांनी केला आहे. हा निर्णय चुकीचा आहे, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि नोकरभरती सुरू करावी अशी मागणीत तांबे यांनी केली आहे.

 अजित पवारांचीही टीका

दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांनी देखील या निर्णयावरून राज्य सरकारवर चांगलाच निशणा साधला आहे. ऑलिम्पिंकमध्ये किंवा इतर खेळात जे खेळाडू सर्वोच्च कामगिरी करतात त्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना सरकारी नोकरीची संधी दिली जाते. त्या खेळाडूंच्या नोंदी ठेवणाऱ्या संघटना असतात. मात्र दहीहंडीची नोंद तुम्ही कशी ठेवणार असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. समजा एखादा गोविंदा शिकलाच नसेल मात्र त्यांने जर या खेळात पारितोषिक जिंकले तर त्याला कोणती नोकरी देणार असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

‘आरक्षण वाढवले नाही’

दरम्यान अजित पवार यांच्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खेळाडूसाठीचे आरक्षण वाढवण्यात आले नाही तर त्याच पाच टक्के आरक्षणात गोविंदांचा देखील समावेश करण्यात आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. उद्या कोणी म्हटलं विटी-दांडू या खेळाला देखील आरक्षण द्या तर त्याचा देखील विचार केला जाऊ शकतो त्यात चुकीचं काय असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.