AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

’11 दिवस उपवास करुन मोदी जिवंत असतील तर…’ ‘या’ काँग्रेस नेत्याला मोदींच्या उपवासावर संशय

Ram Mandir | "भगवान प्रभू रामचंद्रांबद्दल श्रद्धा असेल, तर तुम्ही सुद्धा उपवास करुन जिवंत राहू शकता. गांधी कुटुंबाला कितीही खूश करण्याचे प्रयत्न केले तरी तुम्हाला काँग्रेसच तिकीट मिळणार नाही" असं भाजपा खासदार लहर सिंह सिरोया यांनी म्हटलं आहे.

'11 दिवस उपवास करुन मोदी जिवंत असतील तर...' 'या' काँग्रेस नेत्याला मोदींच्या उपवासावर संशय
pm modi
| Updated on: Jan 24, 2024 | 1:14 PM
Share

Ram Mandir | जगभरातील कोट्यवधी राम भक्तांच स्वप्न सोमवारी साकार झालं. अयोध्येत भव्य राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान होते. यजमान या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर अनुष्ठान पाळलं. पूजाऱ्यांनी मोदींना 3 दिवसांचा उपवास ठेवायला सांगितला होता. पण मोदींनी कठोर 11 दिवसांच अनुष्ठान पाळलं. 11 दिवस मोदींनी उपवास केला. त्याबद्दल साधू, संत आणि देशातील जनतेने मोदींच कौतुक केलं. पण आता एका मोठ्या काँग्रेस नेत्याने या उपवास पाळण्यावर संशय व्यक्त केला आहे.

“मी डॉक्टरसोबत मॉर्निंग वॉकला गेलो होतो. 11 दिवस उपवास केल्यानंतर माणूस जिवंत राहू शकत नाही, असं त्याने मला सांगितलं. पण मोदी जिवंत असतील, तर तो चमत्कार आहे. त्यामुळे त्यांनी उपवास केला का? या बद्दल माझ्या मनात संशय आहे” असं काँग्रेस नेते वीरप्पा मोईली मंगळवारी मीडियाशी बोलताना म्हणाले. “राम मंदिराच्या गर्भ गृहात त्यांनी उपवासाशिवाय प्रवेश केला असेल, तर ती जागा अशुद्ध झालीय. तिथून ऊर्जा निर्माण होणार नाही” असं वीरप्पा मोईली म्हणाले.

भगवान प्रभू रामचंद्रांबद्दल श्रद्धा असेल, तर तुम्ही सुद्धा….

“भगवान प्रभू रामचंद्रांबद्दल श्रद्धा असेल, तर तुम्ही सुद्धा उपवास करुन जिवंत राहू शकता. गांधी कुटुंबाला कितीही खूश करण्याचे प्रयत्न केले तरी मोईली यांना चिक्काबल्लापूरमधून काँग्रेसच तिकीट मिळणार नाही” असं कर्नाटकामधील भाजपा खासदार लहर सिंह सिरोया यांनी म्हटलं आहे.

गोविंद देवगिरी महाराज यांच्या हातून पाणी पिऊन मोदींनी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी त्यांचा 11 दिवसांचा उपवास सोडला. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्गाटन झालं. मंदिर उघडल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून रामललाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.