AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वनाथ पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : काँग्रसने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची […]

विश्वनाथ पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

मुंबई : काँग्रसने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

विश्वनाथ पाटील हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य असून, ते लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही होते. काही दिवसांपूर्वीच विश्वानाथ पाटील यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने भिवंडीतून उमेदवारी नाकारल्याने, ते नाराज आहेत. काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे.

दुसरीकडे, भिवंडीतून शिवसेना-भाजप युतीकडून विद्यामाना भाजप खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, कपिल पाटलांबद्दल शिवसैनिकांच्या मनात नाराजी आहे.

कोण आहेत विश्वनाथ पाटील?

  • विक्रमगड पालघर येथील मूळचे शेतकरी कुटुंबातील आहेत.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते
  • पूर्वाश्रमीच्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून तब्बल दहा वर्षे काम
  • सर्व पक्षातील कुणबी समाज बांधवांना एकत्रित करुन कुणबी सेनेची स्थापना
  • कुणबी सेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सत्तेत अर्धा वाटा
  • कालांतराने बहुतेक समाज बांधवांनी पाठ फिरवत, पुन्हा राजकीय पक्षात जाणे पसंत केल्याने कुणबी सेनेचा प्रभाव ओसरला
  • 2009 मध्ये कुणबी सेनेच्या वतीने अपक्ष म्हणून निवडणुकीत 75000 मते मिळवली
  • 2014 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करत, 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढवताना 3 लाख मते मिळवली

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.