AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वनाथ पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : काँग्रसने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची […]

विश्वनाथ पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

मुंबई : काँग्रसने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

विश्वनाथ पाटील हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य असून, ते लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही होते. काही दिवसांपूर्वीच विश्वानाथ पाटील यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने भिवंडीतून उमेदवारी नाकारल्याने, ते नाराज आहेत. काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे.

दुसरीकडे, भिवंडीतून शिवसेना-भाजप युतीकडून विद्यामाना भाजप खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, कपिल पाटलांबद्दल शिवसैनिकांच्या मनात नाराजी आहे.

कोण आहेत विश्वनाथ पाटील?

  • विक्रमगड पालघर येथील मूळचे शेतकरी कुटुंबातील आहेत.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते
  • पूर्वाश्रमीच्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून तब्बल दहा वर्षे काम
  • सर्व पक्षातील कुणबी समाज बांधवांना एकत्रित करुन कुणबी सेनेची स्थापना
  • कुणबी सेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सत्तेत अर्धा वाटा
  • कालांतराने बहुतेक समाज बांधवांनी पाठ फिरवत, पुन्हा राजकीय पक्षात जाणे पसंत केल्याने कुणबी सेनेचा प्रभाव ओसरला
  • 2009 मध्ये कुणबी सेनेच्या वतीने अपक्ष म्हणून निवडणुकीत 75000 मते मिळवली
  • 2014 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करत, 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढवताना 3 लाख मते मिळवली

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक