AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिसाळलेले कुत्रे चावल्यास या वयात इंजेक्शन सोसणार नाही, गोरेंचं रामराजेंना उत्तर

रामराजे निंबाळकर यांनी माढ्याच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, त्यांचा उल्लेख पिसाळलेली कुत्री असा केला होता. या टीकेला आमदार गोरे यांनी आज उत्तर दिलं.

पिसाळलेले कुत्रे चावल्यास या वयात इंजेक्शन सोसणार नाही, गोरेंचं रामराजेंना उत्तर
| Updated on: Jun 15, 2019 | 11:28 AM
Share

सातारा : काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रतिउत्तर दिलं आहे. “आम्ही पिसाळलेली कुत्री आहोत हे बोलणं आपल्या सभापतीपदाला शोभत नाही. पिसाळलेले कुत्रे चावले तर या वयात इंजेक्शन सोसणार नाही”, अशी घणाघाती टीका जयकुमार गोरे यांनी केली.

रामराजे निंबाळकर यांनी माढ्याच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, त्यांचा उल्लेख पिसाळलेली कुत्री असा केला होता. या टीकेला आमदार गोरे यांनी आज उत्तर दिलं.

“ज्या जनतेने रामराजेंना विधानसभेत पाठवलं, त्याकाळात मंत्रिपद असतानादेखील कालव्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. बारामतीशी इमानदारीने चाकरी करायची म्हणून नीरा देवघरचं पाणी बारामतीकडे वळविले”, असं टीकास्त्र जयकुमार गोरे यांनी सोडलं.

हे पाणी दुष्काळी जनतेला जावं म्हणून आमचा प्रयत्न आहे. आम्ही पिसाळलेली कुत्री आहोत हे बोलणं आपल्या सभापतीपदाला शोभत नाही. पिसाळलेले कुत्रे चावले तर या वयात इंजेक्शन सोसणार नाही, असा टोला जयकुमार गोरेंनी रामराजेंना लगावला.

याशिवाय जयकुमार गोरे यांनी रामराजेंना सन्मानाने वयाचा विचार करून राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला.

रामराजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले होते?

“जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत, तोपर्यंत माझी भूमिका सुद्धा पिसाळलेलीच असेल.” असे म्हणत रामराजे निंबाळकरांनी उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार गोरेंवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली.

कोण आहेत जयकुमार गोरे?

  • जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणचे काँग्रेसचे आमदार आहेत.
  • 2009 आणि 2014 असे दोन वेळा ते या मतदारसंघात निवडून आले आहेत.
  • 2009 मध्ये अपक्ष तर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली.
  • माण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे जयकुमार गोरेंची भूमिका यंदा महत्त्वाची ठरली
  • काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी माण मध्ये जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही

संबंधित बातम्या 

आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना  

लोकसभेला भाजपचा प्रचार, तरीही जयकुमार गोरे काँग्रेसच्या प्रतोदपदी!  

“माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”

रामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय : रणजितसिंह

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.