AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला पार्ट टाईम नव्हे, फुल टाईम अध्यक्ष हवा, तर गेहलोत यांना विरोध करू; पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

अशोक गेहलोत जर राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर आणि अध्यक्ष पदावर राहिले तर आमचा त्याला विरोध राहील. आम्हाला बिलकूल चालणार नाही. आमचा याला विरोध राहील. आम्हाला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेसला पार्ट टाईम नव्हे, फुल टाईम अध्यक्ष हवा, तर गेहलोत यांना विरोध करू; पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा
तर गेहलोत यांना विरोध करू; पृथ्वीराज चव्हाण यांचा इशाराImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2022 | 12:39 PM
Share

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं विधान केलं आहे. जी-23ने अंतर्गत निवडणुका घेऊन पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली आहे. परंतु, पक्षाला पार्ट टाईम अध्यक्ष नको. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा. नव्या अध्यक्षाने लोकांची मोकळेपणाने भेट घेतली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. तर अध्यक्षपदाच्या रेसमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे सर्वात आघाडीवर आहे. मात्र, चव्हाण यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा ही आमची मागणी पूर्ण झाली आहे. आता या निवडणुका पारदर्शीपणे पार पडाव्यात, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी काँग्रेसने मुंबईत केलेल्या ठरावावर टीका केली. मुंबईत करण्यात आलेल्या ठरावाची गरज नव्हती. सर्व पदावर निवडणूका व्हायला पाहिजे. मुंबईत झालेले ठराव कोणी केले मला समजत नाही. असे ठराव कोण करतंय?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी जबाबदारी घ्यावी, असं या ठरावात म्हटलं आहे. राहुल गांधी यांना तुम्ही अर्ज भरा अशा विनंती करू शकता. पण मी अध्यक्ष नाही, मी कोणाला भेटणार नाही. असं चालणार नाही. पूर्ण वेळ अध्यक्ष हवा. जबाबदारी घ्यायला तयार असेल तर काही हरकत नाही, असंही ते म्हणाले.

काँग्रेस पक्ष जेव्हा नरेंद्र मोदी यांना हुकूमशहा म्हणतो तेव्हा काँग्रेस पक्ष तरी लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. राहुल गांधींना देखील हे मान्य नसेल. हे ठराव कोणी केले हे मधुसुदन मिस्त्री यांनी स्पष्ट करायला हवं, असं त्यांनी सांगितलं.

अशोक गेहलोत जर राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर आणि अध्यक्ष पदावर राहिले तर आमचा त्याला विरोध राहील. आम्हाला बिलकूल चालणार नाही. आमचा याला विरोध राहील. आम्हाला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.