AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राने राज्य सरकारला अंधारात ठेवल्यानेच लसीकरणाचा बोगसपणा, नवाब मलिकांचा आरोप

लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण खाजगी लोकांना आणि खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरीत करण्यात आली. त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.

केंद्राने राज्य सरकारला अंधारात ठेवल्यानेच लसीकरणाचा बोगसपणा, नवाब मलिकांचा आरोप
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 01, 2021 | 3:33 PM
Share

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत लसीकरणाचा बोगसपणा झाल्याचे प्रकरण समोर आल्याने एसआयटीमार्फत तपास करण्यात येत आहे. मात्र केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्याने ही घटना घडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण खाजगी लोकांना आणि खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरीत करण्यात आली. त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही, असंही नवाब मलिक म्हणाले. (Nawab Malik criticizes the central government over the issue of bogus vaccination)

सुरुवातीपासून जर खाजगी लोकांना लस देत असताना राज्यांना माहिती दिली असती तर नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवू शकल्या असत्या. त्यामुळे अशाप्रकारचा बोगसपणा झाला नसता, असा टोला नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. त्याचबरोबर ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही, अशा शब्दात मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावरही नाराजी व्यक्त केलीय.

मुंबई पोलिसांकडून बोगस लसीकरणाचा पर्दाफाश

मुंबई बोगस लसीकरण शिबीर आयोजित केली होती. याटोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संदर्भात महत्वाची माहिती देण आवश्यक होतं. यात आतापर्यंत सात गुन्हे नोंद आहेत. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष एसआयटी स्थापन केली आहे, असं नांगरे पाटील म्हणाले. फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बनावट औषधांसदर्भातले गुन्हे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कलमे ही टाकलेली आहेत. कांदिवलीत त्या गुन्ह्यात आठ आरोपींना अटक करून 12 लाख जप्त केले आहेत. मुख्य आरोपींच्या बँकेची खाती गोठवण्यात आल्याचंही नांगरे-पाटील यांनी सांगितलं होतं.

बारामतीतून एक आरोपी अटकेत

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे या आरोपीला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून मुंबईत नागरिकांसाठी लसीकरण केलं जातं होतं. याबरोबरच हे आरोपी वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

संबंधित बातम्या :

ओबीसी आरक्षण राज्याच्या नव्हे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

‘त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार’, मलिकांचा भाजपला इशारा

Nawab Malik criticizes the central government over the issue of bogus vaccination

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली