AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातून फौज, देशभरातील आजी-माजी 12 मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, शेकडो खासदार, तरीही भाजपची हार!

दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. त्यासाठी महाराष्ट्रातून फौज मागवली होती. महाराष्ट्रातील भाजपचे 10 दिग्गज नेते दिल्ली विधानसभेच्या प्रचारात (Mah BJP Leaders in Delhi) उतरले होते.

महाराष्ट्रातून फौज, देशभरातील आजी-माजी 12 मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, शेकडो खासदार, तरीही भाजपची हार!
| Updated on: Feb 11, 2020 | 1:59 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेवर आम आदमी पक्षाने आपला झेंडा कायम ठेवला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्ली काबीज केली. (Delhi Vidhansabhe Election Result)  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.  (Delhi Vidhansabhe Election Result)  काँग्रेसला इथे एकही जागा मिळवता आली नाही.

या निवडणुकीत भाजपने जोरदार ताकद लावली होती. 70 जागांसाठी भाजपचे देशभरातील शेकडो खासदार दिल्लीत तळ ठोकून होते. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांचा ताफाही दिल्लीत कार्यरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या अनेक सभा झाल्या. पण तरीही भाजपला दिल्लीची सत्ता खेचून आणण्यात यश आलं नाही.

महाराष्ट्राची फौज

दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. त्यासाठी महाराष्ट्रातून फौज मागवली होती. महाराष्ट्रातील भाजपचे 10 दिग्गज नेते दिल्ली विधानसभेच्या प्रचारात (Mah BJP Leaders in Delhi) उतरले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार रक्षा खडसे, हीना गावित, पूनम महाजन, भारती पवार, आमदार आशिष शेलार या दिग्गज नेत्यांच्या दिल्लीत सभा झाल्या.

इतकी ताकद लावून भाजपला मोठी मजल मारता आली नाही. भाजपला 2015 मध्ये अवघ्या 3 जागा मिळाल्या होत्या, त्या आता 13 जागांवर पोहोचली आहे.

‘भाजपची प्रगती’

दरम्यान, या निकालाचं विश्लेषण करताना, भाजप आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि आपची अधोगती आणि भाजपची प्रगती असं म्हटलं. “आम्हाला मिळालेल्या जागा, समाधानकारक आहेत. मतांची टक्केवारी वाढली आहे. भाजपच्या जागा 3 वरुन 13 झाल्या, म्हणजे भाजपच्या कामगिरीत सुधारणा झाली”, असं शेलार म्हणाले. काँग्रेसचा सुपडासाफ झाला, आपची मतं घटली, भाजपची वाढ झाली, मतांची टक्केवारीही वाढली, असं शेलारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात 65 जणांचा शड्डू, अरविंद केजरीवालांची संपत्ती…

दिल्ली जिंकण्यासाठी महाराष्ट्र भाजपची फौज, दहा नेते राजधानीत, पंकजा मुंडेंची दिल्लीत सभा

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....