AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस यांनी एका मंत्र्याला झापलं; शिंदे सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी?

यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका अशी सक्त ताकीदच फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली आहे.  फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती समोर येत आहे.

फडणवीस यांनी एका मंत्र्याला झापलं; शिंदे सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी?
भाजपचं मिशन महाराष्ट्र, शिंदे गटासोबत निवडणुका लढवू, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
| Updated on: Sep 13, 2022 | 7:51 PM
Share

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडल्याचे वृत्त समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांना चांगलच झापलं आहे. मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान हा प्रकार घडला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत कृषीमंत्री सत्तारांना चांगलच खडसावलं आहे.

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तारांना सुनावलं आहे. योजनेची घोषणा होण्याआधीच वृत्त उघड झाल्याने फडणवीस यांनी थेट बैठकीत नाराजी व्यक्त केली.

सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावल्याचे समोर आले आहे.

अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस चांगलेच संतापले. थेट मंत्रीमंडळ बैठकीत फडणवीस यांनी सत्तार यांना खडसावले.

यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका अशी सक्त ताकीदच फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली आहे.  फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती समोर येत आहे.

अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय वक्तव्य केलेय?

केंद्र सरकारची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना देशात लागू आहे. या योजने प्रमाणेच राज्यातही नवीन सन्मान योजना सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.

ही योजना अंमलात आणण्याबाबत शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्री अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र, या योजनेबाबत अद्याप काही ठरले नसताना ही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाली.

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर्याने दखल घेतली आणि थेट मंत्रिमंडळ बैठकीतच हा मुद्दा मांडला. फडणवीसांनी कृषीमंत्रीसत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला.

शेतकरी सन्मान योजनेबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली? असा सवालच फडणवीस यांनी विचारला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही सत्तार यांना यावर उत्तर देण्यास सांगितले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी धारेवर धरल्यानंतर सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपण निर्णय झाल्याचे माध्यमांना म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचेच सांगितले, असे सत्तार यांनी सांगीतले.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....