AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणचा आंबा गोड की लोकं? पंगा घेतला तर पुढच्या चार पिढ्या… देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गोरेगाव येथे करण्यात आलं.

कोकणचा आंबा गोड की लोकं? पंगा घेतला तर पुढच्या चार पिढ्या... देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Image Credit source: social media
| Updated on: Dec 06, 2022 | 11:23 AM
Share

मुंबईः कोकणातला आंबा (Mango) गोड की लोकं? असा प्रश्न पडतो. आंबा तर गोड आहेच. लोकांबद्दल एक ऐकलंय…ते खूप सरळ आहेत. पण  कोकणातील लोकांशी जर पंगा घेतला तर त्याच्या चार पिढ्या उध्वस्त करतात, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कोकण महोत्सवात (Kokan Festival) केलं. त्यामुळे कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गोरेगाव येथे करण्यात आलं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कोकण महोत्सवात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ कोकणी माणूस अतिशय सरळ आहे. निर्मळ आहे. पण त्याचवेळी पंगा घेतला तर घरदार विकूनही कोर्ट कज्जे करून चार पिढ्या तो थांबत नाही.

तो चांगुलपणा ही कोकणी माणसाची शिदोरी आहे. त्यामुळे चांगल्यांना अधिक चांगलं देता येईल, असा आमचा प्रयत्न आहे…

नाणार रिफायनरीविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ ज्या वेळी रिफायनरी आणली तेव्हा ती ग्रीन रिफायनरी असेल, असा आग्रह आहे. इथलं प्रदूषण वाढणार नाही.

ज्यात उत्सर्जन नाही, असं तंत्रज्ञान वापरणार आहोत. 5 हजार एकरात त्यांना फक्त ग्रीनरीही तयार करावी लागेल, असा नियम आम्ही केल्याचं फडणवीस म्हणाले.

या रिफायनरीमुळे कोकणात 1 लाख लोकांना थेट रोजगार आणि 5 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकतो. पण काही लोकांनी आरोप केला की रिफायनरीमुळे कोकणातला आंबाच येणार नाही. पण मी गुजरातला 1 नंबरची रिफायनरी आहे.

कोकणच्या आंब्याच्या खालोखाल गुजरातचा आंबा देश-विदेशात निर्यात होतो. जगभरात तो जातो. त्यामुळे काही लोकांना कोकणाचा विकास नकोय. त्यांना कोकण मागास ठेवून, मतं घेऊन राजकारण करायचं आहे.

त्यामुळे कोकणात रिफायनरी आम्ही करून दाखवू. कोकणी माणसाच्या हाताला काम देऊन दाखवू, हा आमच्या सरकारचा निर्धार आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.