AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तसा’ एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही, कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा शब्द

कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा कोकणवासीयांना शब्द

'तसा' एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही, कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा शब्द
| Updated on: Dec 06, 2022 | 11:46 AM
Share

मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये कोकण महोत्सव (Kokanmahotsav) सुरु आहे. या महोत्सवादरम्यान संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणवासींना शब्द दिला आहे. “प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही”, असं फडणवीस म्हणालेत. कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासनही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं आहे.

कोकणाने काही लोकांना भरभरून दिलं मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केलं नाही. मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचं कोकणाचा विकासाकडे विशेष लक्ष आहे. कोकणाच्या विकासाचं धोरण ते आखत आहेत. कोकणामध्ये नवनवीन योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला काही लोकांचा विरोध आहे. तर काहींचा पाठिंबा आहे. त्यावर बोलताना फडणवीस यांनी कोकणवासीयांना आश्वासित केलं आहे.

कोकणात येणारा पर्यटक वर्ग मोठा आहे. त्यामुळे पर्यटनाच्या संदर्भातदेखील कोकणातील जलद गतीने प्रकल्प सुरु करण्यात येतील, असंही फडणवीस म्हणालेत.

कधी कधी मला प्रश्न पडतो की कोकणातला आंबा गोडे की कोकणातील लोक गोड आहेत. कोकणातील लोकांशी जर पंगा घेतला तर त्याच्या चार पिढ्या उध्वस्त करतात. चांगल्याला अधिक कसं चांगलं देता येईल एक काम आम्ही करत आहोत. एकही प्रदूषण होणारा उद्योग कोकणात येणार नाही, असा शब्द फडणवीसांनी कोकणवासीयांना दिला आहे.

रिफायनरी संदर्भात पाच हजार एकरामध्ये ग्रीनरी करण्याची अट दिली होती. तिथे जवळपास रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असता. काही लोकांना कोकणाचा विकास नकोय त्यांना कोकण हा मागास ठेवायचा आहे. आम्हाला मात्र कोकणाचा विकास करायचा आहे.त्यादृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. रिफायनरी प्रकल्प हा आम्ही कोकणामध्ये करणार आहोतच आणि जेणे करून लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असं म्हणत रिफायनरी प्रकल्पाबाबत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....