मंत्री आत्ममग्न, अख्खं सरकार आत्ममग्न, राज्यात सरकार आहे की नाही?; फडणवीस कडाडले

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारव टीकास्त्र सोडलं आहे. (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi In Pandharpur Bypoll rally)

मंत्री आत्ममग्न, अख्खं सरकार आत्ममग्न, राज्यात सरकार आहे की नाही?; फडणवीस कडाडले
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 3:08 PM

पंढरपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारव टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे बळी, ऑक्सिन नाही, रेमडेसीवीर नाही, बेड नाहीत, अशी अवस्था राज्याची झाली आहे, असं सांगतानाच मंत्री आत्ममग्न आहेत. अख्खं सरकार आत्ममग्न आहे, राज्यात सरकारच आहे की नाही?; असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi In Pandharpur Bypoll rally)

पंढरपूर-मंगळवेढा येथील पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली. आपण सारे इतक्या मोठ्यासंख्येने उपस्थित आहात, यापेक्षा आपण सारे मास्क घालून उपस्थित आहात, याचा मला अधिक आनंद आहे. मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला आपण मैदानात उतरविले आहे. विकासाची नवीन वाट मंगळवेढा, पंढरपूरला दाखविण्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद देणार हे नक्की आहे, असं सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार हे लबाड सरकार आहे. त्यांची आश्वासने ही लबाडी आहे. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे होत नाही. त्यामुळे 15 वर्ष जे सत्तेत होते, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. वीज बिलांना स्थगिती दिली, तेव्हा वाटले राजा उदार झाला. पण, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी वीज वसुली सुरू केली, अशी टीका फडणवीस यांनी केली.

महाविकास ते महावसुली आघाडी

17 एप्रिल रोजी मतदान झाले की, हे सरकार पुन्हा 18 एप्रिलपासून तुमची वीज कापणार. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित कोण, तर मुंबईच्या बिल्डरांना 5000 कोटींची सूट दिली. गरीब, शेतकरी यांना मात्र मदत करायला पैसा नाही, हे सांगणारे हे सरकार आहे. पूर्वी हे सरकार होते, महाविकास आघाडी. नंतर झाले, महाविनाश आघाडी आणि आता झाले, महावसुली आघाडी. आज पोलिसांना हप्तेवसुलीचे टार्गेट दिले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

दिल्लीतून निधी आणू

सरकारमध्ये आले, तेव्हा बांधावर जाऊन सांगायचे, 50 हजार देऊ, दीड लाख देऊ. आपण आज 2000 रुपयेही कुणाला मिळाले नाही. हे म्हणाले कर्जमुक्ती देऊ. पण, आज जनतेला या सरकारपासून मुक्ती मागण्याची वेळ आली आहे, असं सांगतानाच आमच्या सरकारच्या 5 वर्षांच्या काळात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम केले. 35 गावांमध्ये पाण्यासाठी प्रत्येकवेळी आश्वासन दिले जाते. पण, होत काही नाही. मात्र, सरकारने पैसा दिला नाही तरी जो निधी लागेल, तो आम्ही थेट दिल्लीहून आणू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi In Pandharpur Bypoll rally)

संबंधित बातम्या:

Pandharpur By-Election : सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पंढरपुरात देवेंद्र फडणवीसांचा पहिला थेट इशारा

सरकार पाडतील तेव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; राऊतांचा खोचक टोला

लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक

(Devendra Fadnavis slams maha vikas aghadi In Pandharpur Bypoll rally)

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.