AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक

लॉकडाऊन करत असाल तर आर्थिक पॅकेज जाहीर करा, या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
| Updated on: Apr 12, 2021 | 2:45 PM
Share

मुंबई: लॉकडाऊन करत असाल तर आर्थिक पॅकेज जाहीर करा, या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. लॉकडाऊन करताना पंतप्रधान नरेंद मोदींनी कुणाला विचारात घेतलं नव्हतं आणि पॅकेजही जाहीर केलं नव्हतं, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही टीका केली. देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नाही, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

पैसे द्या, पैसे टाका सांगणं योग्य नाही

महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल. परंतु, जे काही भाजपचे लोक पैसे द्या, पैसे टाका सांगत आहेत ते योग्य नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्चितपणे सरकार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सेमी लॉकडाऊनची स्थिती

राज्यात सेमी लॉकडाऊनची स्थिती आहे. आज दिवसाला 63 हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. बेड्स, ऑक्सिजन पुरवठा याची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील जो काही निर्णय असेल तो परिस्थितीचा आढाव घेऊनच घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीसांनी गुजरातकडे पाहावं

कोरोना काळात संपूर्ण देशात जसे लोकांना पैसे देण्यात आले, तसे महाराष्ट्रातही देण्यात आले. मजुरांना 4 महिने दोनवेळेचं जेवण देण्यात आलं आहे, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर आरोप करत आहेत. पण गुजरातमध्ये काय स्थिती आहे. ते त्यांनी बघावं. महाराष्ट्राने चांगलं काम केलं आहे. उत्तर प्रदेशात तर टेस्टच केल्या जात नाही, असंही त्यांनी सांगितलं. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

संबंधित बातम्या:

सरकार पाडतील तेव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; राऊतांचा खोचक टोला

Pandharpur By-Election : सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पंढरपुरात देवेंद्र फडणवीसांचा पहिला थेट इशारा

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कोडं उलगडलं, पहिल्यांदाच बालाजीच्या मृत्यूचं कारण उघड

(nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.