AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना मदतीचं स्वत: मोदींनी आश्वासन दिलंय, प्राथमिक जबाबदारी राज्याची, तुम्ही काय करणार हे सांगा : फडणवीस

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा प्राथमिक जबाबदारी ही राज्याची आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis slams Thackeray Government).

शेतकऱ्यांना मदतीचं स्वत: मोदींनी आश्वासन दिलंय, प्राथमिक जबाबदारी राज्याची, तुम्ही काय करणार हे सांगा : फडणवीस
| Updated on: Oct 19, 2020 | 10:38 AM
Share

मुंबई : “अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या परिस्थितीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा प्राथमिक जबाबदारी ही राज्याची आहे. तुम्ही काय करणार हे पहिले सांगा”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांना ठणकावलं आहे (Devendra Fadnavis slams Thackeray Government).

देवेंद्र फडणवीस आज (19 ऑक्टोबर) पुणे, सांगली, सातारा भागाचा दौरा करणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करणार आहेत. या दौऱ्याआधी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला (Devendra Fadnavis slams Thackeray Government).

“राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. आधी कोकणात मग विदर्भात, आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे” असं फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकारकडून तात्काळ मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण सरकारकडून अशी कुठलीही मदत दिली जात नाही. हे सरकार गंभीर नाही. हे सरकार फक्त घोषणा करतं. परिस्थितीला गांभीर्याने घेत नाही”, अशी टीका फडणवीस यांनी केली.

“मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो तेव्हादेखील शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली होती. शेतकऱ्यांना मदतीसाठी स्वतः देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं आहे. केंद्राची मदत दिली जाईल, असं मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा प्राथमिक जबाबदारी ही राज्याचे आहे. तुम्ही काय करणार हे पहिले सांगा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूरला दौऱ्यासाठी जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. एका जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांना कळेल की शेतकरी किती अडचणीत आहे”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी

अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.