AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘मविआ’ हे बेईमानीचे सरकार, फडणवीसांनी सांगितला दोन्ही सरकारमधला फरक

विरोधकांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यामधील एकीची चिंता केली पाहिजे. कारण तीन पक्षाच्या तीन वेगळ्या दिशा पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड आम्हाला न विचारता केली असं काँग्रेस नेते बोलले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सत्तेत असतानाही तीन पक्षामध्ये एकी नव्हती आता विरोधी पक्षात गरज असतानाही एकी दिसत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

Devendra Fadnavis : 'मविआ' हे बेईमानीचे सरकार, फडणवीसांनी सांगितला दोन्ही सरकारमधला फरक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
| Updated on: Aug 16, 2022 | 7:59 PM
Share

मुंबई : पावसाळी अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरवात होत आहे. त्याअनुशंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद पार पडली असून अधिवेशाच्या पूर्वसंध्येला (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी (MVA) महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी दोन्ही सरकारमधील फरकच स्पष्ट करुन सांगितला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हतीच तर जनतेच्या हिताचे निर्णय हे लांबच राहिले आहेत. केवळ शेतकऱ्यांच्याच बाबतीत मविआ हे बेईमानीचे सरकार नव्हते तर सर्वच क्षेत्रासाठी ते सरकार नुकसानीचे होते असा घणाघात करीत फडणवीस यांनी अनेक उदाहरणे समोर दिली आहेत. तर (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत एकत्रित येऊन मतं मागितली होती ते दोन पक्ष मिळून आज सरकार स्थापन झालं आहे. महाविकास आघाडीचं सरकार बेईमानीनं आलं होतं. जनतेचा कल डालवून ते सरकार स्थापन झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांमध्ये एकी नाही

विरोधकांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यामधील एकीची चिंता केली पाहिजे. कारण तीन पक्षाच्या तीन वेगळ्या दिशा पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड आम्हाला न विचारता केली असं काँग्रेस नेते बोलले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सत्तेत असतानाही तीन पक्षामध्ये एकी नव्हती आता विरोधी पक्षात गरज असतानाही एकी दिसत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. आधी मंत्रालय, सह्याद्री, मंत्र्यांचे बंगले रिकामे होते, आता इथे पाय ठेवायला जागा नाही. मुख्यमंत्री मी आमचे नेते मैदानात आहेत असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

पंचनाम्यातील तक्रारीही दूर होणार

मागच्या सरकारनं जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचं अंतर होतं. आमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घेतला. पुरवणी मागण्या झाल्यानंतर आम्ही मदत द्यायला सुरुवात करु. आम्ही आताही मदत देऊ शकतो. पण 95 टक्के पंचनामे झाले आहेत. 5 टक्के बाकी आहेत. तर काही ठिकाणी पंचनाम्याबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

निर्णयाला स्थगिती नाही तर तपासणी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही याचा पुन्नउच्चार फडणवीस यांनी केला आहे. आम्ही कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिली नाही. आम्ही पुनरावलोकन करत आहोत. कारण 100 रुपये गरज आहे तिथे 500 रुपये वाटले गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्याची माहिती घेत आहोत. कुठल्या पक्षाचं सरकार होतं याचा विचार न करता जनतेच्या हिताचे निर्णय हे सरकार घेत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.