AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का; दिपाली सय्यद अखेर शिंदे गटात प्रवेश करणार; काय म्हणाल्या दिपाली सय्यद?

यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या बंडाची पाठराखणही केली. शिंदे गटाने केली ती गद्दारी नाही. तो त्यांचा हक्क आहे. त्यांनी आपला हक्क मागितला आणि त्यासाठी लढले. राजाच्या आजूबाजूच्या लोकांचेही अधिकार हक्क असतात.

सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का; दिपाली सय्यद अखेर शिंदे गटात प्रवेश करणार; काय म्हणाल्या दिपाली सय्यद?
| Updated on: Nov 09, 2022 | 12:45 PM
Share

मुंबई: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दिपाली सय्यद यांनी आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दिपाली सय्यद यांनी हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

दिपाली सय्यद यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गट सोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मी येत्या शनिवारी शिंदे गटात सहभागी होणार आहे. येत्या तीन दिवसांवर माझा प्रवेश आहे. त्यामुळे कधी आणि किती वाजता प्रवेश करायचा. कुठे प्रवेश होईल, याची चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, असं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.

मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या पाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच कर्तव्य भावनेतून मी शिंदे गटात येत आहे, असं त्या म्हणाल्या.

एकनाथ शिंदे जी जबाबदारी मला देतील ती मी स्विकारेन. मला ते काय जबाबदारी देणार आहेत, याची मला पुरती कल्पना आहे. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी तयार आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या बंडाची पाठराखणही केली. शिंदे गटाने केली ती गद्दारी नाही. तो त्यांचा हक्क आहे. त्यांनी आपला हक्क मागितला आणि त्यासाठी लढले. राजाच्या आजूबाजूच्या लोकांचेही अधिकार हक्क असतात. त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा, असंही त्या म्हणाल्या.

मोठ्या पातळीवर वाद जेव्हा होतो, तेव्हा त्याची कारणं जनतेला कळली पाहिजेत. सतत खोके खोके म्हटलं जातं. खोक्यांचं राजकारण काय आहे हे लोकांना कळंल पाहिजे. या खोक्यांचे मुख्यसूत्रधार कोण आहेत हे सुद्धा कळलं पाहिजे.

मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. कुठे काय होतंय आणि कोणत्या गोष्टी कुठपर्यंत जातात हे सुद्धा जनतेला कळलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन