Disha Salian case: दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस देण्यापूर्वी संजय राऊतांचे मोठे विधान, ठाकरे कुटुंबीय…
Disha Salian case: दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दिशा सालियान प्रकरण चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यापासून अनेक अपडेट समोर येत आहेत. दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर आज दिशाचे वडील सतीश सालियन हे आदित्य ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांना अब्रू आहे आणि आम्हाला अब्रू नाही का? अब्रू अब्रू म्हणतात त्यांना अब्रू आहे आणि आम्हाला नाही का? तुम्ही ज्या पद्धतीने कोणाच्या तरी हातचं बाहुलं बनून आमच्यावरती चिखल फेक करताय, ठाकरे कुटुंबावर आमच्या प्रतिष्ठेचा, आमच्या अब्रूचा काही सवाल आहे की नाही? मी कालही म्हणालो हा जो प्रकार आहे काही बेवड्यांचा आणि उरबडव्यांचा आहे. यामध्ये काही बेवडे आहेत आणि काही उरबडवे आहेत. ते एकत्र आले. आणि त्यांना कोणी तरी नियंत्रीत करत आहे की तुम्ही हे करा, हे बोला, आज इकडे जा, तिकडे जा, हे सर्व चालू आहे.
“ठाकरे कुटुंब पुढे सरकतंय”
पुढे संजय राऊत म्हणाले की, नाहीतर मी अजूनही या विषयावर स्पष्टपणे बोललेला नाही. मी बोलणार. जर संयमाचा बांध तुटला तर मी बोलणार. मी पाहातोय. पण लक्षात घ्या हे जे कोणी तिचे वडील आहेत सहा वर्षांपासून त्यांनी हा विषय त्यांचं पूर्ण समाधान झालंय. काही वस्तूस्थिती त्यांना कळाल्यानंतर की ही हत्या नाहीये हा अपघात आहे. हा अपघात 2020 सालचं हे प्रकरण आहे. पण जेव्हा महाराष्ट्रात ठाकरे कुटुंब पुढे सरकतंय काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी की अशी प्रकरणे उकरुन काढायची. त्यासाठी यंत्रणा उभी करायची हेच चालू आहे ना? दुसरं काय चालू आहे याच्यामध्ये मला सांगा.
“त्या मुलीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी”
दिशा सालियान विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्या मुलीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे हे मी वारंवार सांगत आहे आणि संदर्भात सविस्तर निवेदन आदित्य ठाकरे यांनी काढलं आहे. जी व्यक्ती मृत व्यक्तीला कधी भेटली नाही, कधी ओळखत नाही, संबंध आला नाही त्याच्यावर तुम्ही चिखल फेक करता? मला माहिती आहे याच्यामागे कोण आहे? आणि का करताय? कुठून अर्थ पुरवठा होत आहे याच्या मागे. हे जे कोणी बॅरिष्ठर याच्यामागे जास्त बोलत आहेत त्यांचीही कुंडली येईल बाहेर.
