AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Raut : भाजपाला संजय राऊतांची भीती म्हणून ईडीची कारवाई, संजय राऊतांच्या स्टाईलमध्ये सुनील राऊत झाले व्यक्त

संजय राऊत यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रभाव आहे. गेल्या 30 ते 32 वर्षापासून ते पक्षासाठी काम करीत आहेत. जे बाळासाहेबांना अपेक्षित होते तेच संजय राऊत करीत आले आहेत. त्यामुळे संजय राऊत कोणता भ्रष्टाचार हे करुच शकत नाहीत. त्याबद्दल सर्व जनतेने आणि विरोधकांनीही निश्चिंत रहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दोन अडीच वर्षापासून त्यांनी भाजपाविरोधात घेतलेली भूमिका त्यामुळेच ही कारवाई झाली आहे.

Sunil Raut : भाजपाला संजय राऊतांची भीती म्हणून ईडीची कारवाई, संजय राऊतांच्या स्टाईलमध्ये सुनील राऊत झाले व्यक्त
Image Credit source: TV9 marathi
| Updated on: Aug 07, 2022 | 3:27 PM
Share

मुंबई :  (Sanjay Raut) खा. संजय राऊत हे सध्या (ED Office) ईडीच्या अटकेत असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. रविवारी मेडिकलसाठी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, (Sunil Raut) सुनील राऊत यांनी ईडीच्या कारवाईमध्ये काही तथ्य नसून त्यांना गेल्या दोन-अडीच वर्षापासून भाजपाविरोधात भूमिका घेतल्याने हा कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. एवढेच नाहीतर संजय राऊत हे तंदरुस्त, मजबूत आणि आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी संजय राऊत यांच्या स्टाईलमध्येच सांगितले. शिवाय सोमवारी त्यांची पोलीस कस्टडीही संपत असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ते मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळेच त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

40 बंडखोरांना शिवसैनिकांचा तळतळाट

40 आमदारांनी केवळ शिवसेना पक्षाशीच नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी देखील गद्दारी केली आहे. आणि शिवसेना पक्षाला सोडून जाणाऱ्यांची स्थिती काय होते हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसैनिकांचे अश्रु हे बंडखोरांना लागलेला तळतळाट आहे. अवघ्या महिन्याभरातच ते अस्वस्थ झाल्याने मैत्री देनाचे औचित्य साधून एकत्र येण्याचे आवाहन करीत आहेत. पश्चातापानंतर जर त्यांना यायचेच असेल तर त्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करावा असेही सुनील राऊत यांनी म्हणले आहे.

संजय राऊत बाळासाहेबांचे निष्ठावंत

संजय राऊत यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रभाव आहे. गेल्या 30 ते 32 वर्षापासून ते पक्षासाठी काम करीत आहेत. जे बाळासाहेबांना अपेक्षित होते तेच संजय राऊत करीत आले आहेत. त्यामुळे संजय राऊत कोणता भ्रष्टाचार हे करुच शकत नाहीत. त्याबद्दल सर्व जनतेने आणि विरोधकांनीही निश्चिंत रहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दोन अडीच वर्षापासून त्यांनी भाजपाविरोधात घेतलेली भूमिका त्यामुळेच ही कारवाई झाली आहे. भाजपाला संजय राऊतांची भीती त्यामुळेच ईडीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले आहे.

कारवाईला भीत नाही, कायम शिवसेनेसोबत

ईडी ला पुढे करुन भाजपाला काय साध्य करायचे आहे हे सर्व राज्याला माहित आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे. काल त्यांच्या पत्नीला चौकशीला बोलावण्यात आले होते. उद्या मला देखील बोलावले जाईल. पण राऊत कुटुंब हे शिवसेना कधीही सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपात पाहत असल्याचेही सुनील राऊत यांनी ठणकावून सांगितले.

Follow Us
तू भंडारा लाव नाही तर ...; मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा मुंडेंवर निशाणा!
तू भंडारा लाव नाही तर ...; मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा मुंडेंवर निशाणा!.
दुबईत अडकलेल्या भारतीयांची घरवापसी! सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
दुबईत अडकलेल्या भारतीयांची घरवापसी! सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव.
शरणागती पत्करा, नाहीतर... ; ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
शरणागती पत्करा, नाहीतर... ; ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! काय आहे आजचे दर?
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! काय आहे आजचे दर?.
संजय केणेकरांचा दुबईत अडकलेल्या भारतीयांशी फोनवरुन संवाद
संजय केणेकरांचा दुबईत अडकलेल्या भारतीयांशी फोनवरुन संवाद.
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.