AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : ‘महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु’ म्हटल्यावर ‘जीवितास धोका आहे होss’ म्हणून बोभाटा

Shiv sena on BJP : पुढील दोन दिवसांत त्यांचं सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत.

Saamana : 'महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु' म्हटल्यावर 'जीवितास धोका आहे होss' म्हणून बोभाटा
भाजपवर थेट हल्लाबोल!Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 28, 2022 | 7:22 AM
Share

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) बंडखोर आमदारांच्या कृत्यांवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, असं शिवसेनेपैकी (Shiv sena Rebel) कुणी बोललं तर यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे होss, असं म्हणून बोभाटा करायचा, अशा शब्दांत सुनावण्यात आलं आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court on Maharashtra Political Crisis) पार पडलेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना आमदारांच्या जीविताला धोका असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या मुखपत्रातून याला उत्तर देण्यात आलंय. यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे यांनाही टोला लगवाण्यात आला. एका बाजूला चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांना दोन दिवसात सरकार पडेल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरुनही सामनातून टोला लगावण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलंय?

भाजपची अलिकडच्या काळातली वक्तव्य गोंधळात टाकणारी आहेत. एकीकडे चंद्रकांत पाटलांनी सांगयचं, शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही. त्याचवेळी रावसाहेब दानेवांनी अंगाला हळद दावून आणि मुंडावळ्या बांधून बोलायचे, ‘आता फार तर एक -दोन दिवसच विरोधी पक्षात बसू. दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचं सरकार येईल’ शिवसेनेच्या बंडाशी संबंध नाही असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दोन दिवसांत भाजपचं सरकार येईल, असं बोलायचं, त्यामुळे खरं काय? असा सवाल सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय.

भाजपवर हल्लाबोल!

भाजपशी जे पाट लावू इच्छित आहेत, त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच, असंही सामनातून म्हटलंय. दानवे म्हणतात, त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचं सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत. पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय? असा सवालही सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय.

बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्त्वाची करायची आणि भलतेच उद्योग करुन महाराष्ट्रद्रोह्यांचे हात बळकट करायचे, असं म्हणत शिवसेनेने भाजपसह बंडखोर आमदारांनाही सुनावलंय.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.