AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahayuti | किती जागांवरुन वाद? उमेदवार कधी जाहीर करणार? त्या बद्दल शिंदे गटाने दिली महत्त्वाची माहिती

Mahayuti | भाजपाने दोन दिवसांपूर्वी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवार होते. पण 28 उमेदवारांची नाव अजून बाकी आहेत. महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार? याचीच उत्सुक्ता आहे.

Mahayuti | किती जागांवरुन वाद? उमेदवार कधी जाहीर करणार? त्या बद्दल शिंदे गटाने दिली महत्त्वाची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Updated on: Mar 15, 2024 | 11:45 AM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. पण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमधील काही जागांवरुन असलेला तिढा अजून संपलेला नाहीय. त्यामुळेच महायुतीने त्यांचे 48 उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महाराष्ट्रात याच दोन आघाड्यांमध्ये टक्कर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आघाड्यांमध्ये आहेत. महायुतीमध्ये भाजपा मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवार होते. पण 28 उमेदवारांची नाव अजून बाकी आहेत. महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार? याचीच उत्सुक्ता आहे. महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेवटी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे.

भाजपाच्या मागे फरफटत चाललोय, असा जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश जाणार नाही, याची काळजी त्यांना घ्यायची आहे. म्हणूनच हे दोन्ही पक्ष सहजासहजी कुठल्या जागेवरुन आपला दावा मागे घेणार नाही. महायुतीने महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याच टार्गेट ठेवलं आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जागा वाटपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. “भाजपाने त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात कुठलाही वाद नव्हता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी रविवारी किंवा सोमवारी सकाळी प्रसिद्ध होईल” असं संजय शिरसाट म्हणाले.

कुठल्या जागांवरुन वाद?

“ज्या एक-दोन जागांचा वाद आहे, त्याचा तिढा आज किंवा उद्या दुपारपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्री उर्वरित जागांवर उमेदवार जाहीर करतील” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. “बारामतीमध्ये विजय शिवतारे स्वतंत्र लढणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलवून समजावल आहे. कोकण तसच एक-दोन जागांचा प्रश्न आहे. एकदिलाने सर्व मिळून काम करु. सर्वांचा मिळून 45 चा आकडा पार करण्याचा प्रयत्न असेल” असं संजय शिरसाट म्हणाले.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.