AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 1 सप्टेंबरपर्यंत भरात येणार उमेदवारी अर्ज

पुणे जिल्ह्यातील (Pune District) 61 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम (Gram Panchayat Election) जाहीर झाला आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील 38 आंबेगावमधील 18 आणि खेडमधील 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा समावेश आहे.

Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 1 सप्टेंबरपर्यंत भरात येणार उमेदवारी अर्ज
| Updated on: Aug 17, 2022 | 8:31 AM
Share

पुणे :  पुणे जिल्ह्यातील (Pune District) 61 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम (Gram Panchayat Election) जाहीर झाला आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील 38 आंबेगावमधील 18 आणि खेडमधील 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा समावेश आहे. संबंधित ग्रामपंचयातींच्या निवडणुकीबाबत येत्या गुरुवारी तहसीलदारांकडून नोटीस जारी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 ऑगस्ट 2022  ते दिनांक 1 सप्टेंबर 2022  या कालावधीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. नव्या सररकारच्या आदेशानुसार  या सर्व ग्रामपंचयातींच्या सरपंचाची (Sarpanch) निवड थेट नागरिकांमधून होणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील दोनशे पेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले होते. यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला तर शिवसेनेला बंडखोरीचा मोठा फटका बसला. शिवसेनेने प्रतिष्ठापणाला लावलेल्या अनेक जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीत देखील शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

सरपंचाची निवड थेट मतदारांमधून

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड ही थेट जनतेमधून करण्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर काही ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये सरपचांची निवड थेट जनतेमधून झाली. मात्र त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तते आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच पूर्वीच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा एकदा सरपंचाची निवड ही सद्यस्यांमधून सुरू झाली. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात भाजपाचे सरकार आले आहे.  महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती देऊन सरपंचाची निवड थेट जतनेमधून करण्याचा पूर्वीचा निर्णय पुन्हा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सुद्धा सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार आहे.

कोण बाजी मारणार?

नुकतेच 200 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे निकाल लागले. या निवडणूक निकालामध्ये बाजी मारत भाजप नंबर एकचा तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. शिवसेनेला मात्र बंडखोरीचा मोठा फटका बसला. ज्या जागांवर शिवसेनेचा विजय निश्चित होता अशा अनेक जागांवर शिंदे गटाचा विजय झाला. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या घटली. दुसरीकडे पुणे जिल्ह्या सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसत असून, या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चूरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?