AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना 10 दिवस जेलमध्ये राहावं लागणार? वकिलांनी सांगितलं!

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कोर्टात सांगितलं.

जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना 10 दिवस जेलमध्ये राहावं लागणार? वकिलांनी सांगितलं!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 12, 2022 | 1:37 PM
Share

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआय (CBI) प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. भ्रष्टाचार आणि वसुलीच्या आरोपांचा सीबीआयतर्फे तपास सुरु आहे. या केसमध्ये आज जामीन मंजूर झाला असला तरीही पुढील 10 दिवस त्यांना जेलमधून बाहेर निघता येणार नाही. कारण जामीन मिळाल्यानंतर 10 मिनिटातच या आदेशावर कोर्टाने स्थगिती दिली, अशी माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली.

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कोर्टात सांगितलं. त्यासाठी जामीनाच्या अर्जावर 10 दिवसांची स्थगिती मिळावी, अशी मागणी सीबीआयने केली.

उच्च न्यायालयाने हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे जामीन मिळाला असला तरीही अनिल देशमुख यांची पुढील 10 दिवस तुरुंगातून मुक्तता होणार नाही, अशी माहिती वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली.

अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या घोटाळ्यात जामीन मंजूर करतानाच कोर्टाने या केसमध्ये कुठेही तथ्य दिसत नाही, असं म्हटलंय. काही अटी शर्थींच्या आधारे अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आलाय.  1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाल्याची माहिती वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सध्या ते जेलमध्ये आहेत. सुप्रीम कोर्टाने सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर जामीनाचा आदेश कायम ठेवल्यास अनिल देशमुख यांना जेलमधून तत्काळ मुक्त करण्यात येईल, अशी माहिती वकिलांनी दिली.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल