AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅनेज झालेला आहे, अदृश्य शक्ती आहे… ‘त्या’ आरोपांवर गिरीश महाजन यांचा हल्लाबोल

अनिल देशमुख यांना बोलण्याचा अधिकार नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात अशा पद्धतीने राजकीय बोलणे अपेक्षित नाही असे गिरीश महाजन यांनी देशमुख यांच्यावर टीका करताना म्हटले आहे. मुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडत आहेत तर अनेकांच्या पोटात दुखत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.

मॅनेज झालेला आहे, अदृश्य शक्ती आहे... 'त्या' आरोपांवर गिरीश महाजन यांचा हल्लाबोल
girish mahajanImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 07, 2024 | 4:43 PM
Share

मुंबई | 7 फेब्रुवारी 2024 : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हं अखेर अजित पवार यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठ्ठा धक्का असल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाचा निर्णयावर प्रचंड टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला आहे. अजितदादांचे आपण स्वागत करीत आहे. मी आधीपासून सांगत होतो की लोकशाहीत ज्याचे बहुमत त्याचाच पक्ष असतो असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी पक्षा संदर्भात काल निवडणूक आयोगाचा निकाल आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यावर निवडणूक आयोग मॅनज झाला आहे. या मागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. त्याचा समाचार ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. लोकशाहीत ज्याचे बहुमत त्याचाच पक्ष असतो.  55 आमदारांपैकी शिवसेनेत 10 आमदारही राहीलेले नाहीत. राष्ट्रवादीची देखील तिच परिस्थिती झालेली आहे. त्यांच्याकडे खासदार शिल्लक राहीलेले नाहीत. 80 टक्के आमदार, खासदार जेव्हा एका बाजूला जातात त्यावेळी काहीही पर्याय नसतो. त्यामुळे आयोगाने अतिशय योग्य निर्णय दिला असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

जसे पेरतो तसे उगवते

जसे पेरतो तसे उगवते, मागे पवार साहेबांनी तेच केलं. पवार साहेबांनी पक्ष फोडला नव्हता का ? पवार साहेब बाहेर पडून मुख्यमंत्री झाले नव्हते का ? ही त्यांची परंपरा आहे मग आता का वाईट वाटते ? आपण केलं तर ते चांगलं आणि अजित दादांनी केलं ते वाईट अशी दुहेरी भूमिका चालणार नाही असे गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.

राज आणि आमच्यात मतमतांतर नाही

भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत विचारता ते म्हणाले की मला याबाबत काही माहीती नाही. राज ठाकरे आणि आमचे काही मतमतांतर नाही…आमचे विचार काही वेगळे नाहीत, काय होईल काय नाही माहीत नाही..पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील असे महाजन यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत यांचा भोंगा सकाळीच सुरु होतो अशी टीकाही महाजन यांनी केली आहे.

Follow Us
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?