AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election : ना ठाकरे ना शिंदे, ग्रामपंचायत निकालांत भाजपानंतर या पक्षाचं पारडं जड दिसतंय?

सकाळी 10 वाजेच्या सुमारास जवळपास 667 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 167 ग्राम पंचायती मिळवत भाजपाने राज्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

Gram Panchayat Election : ना ठाकरे ना शिंदे, ग्रामपंचायत निकालांत भाजपानंतर या पक्षाचं पारडं जड दिसतंय?
| Updated on: Dec 20, 2022 | 11:59 AM
Share

मुंबईः राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निकाल (Gram Panchayat Election) हाती येण्यास आता काही तासच बाकी आहेत. 7,751 ग्रामपंचायतींमध्ये कोणत्या पक्षाचं पारडं जड होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही ग्रामपंचायतींची मतमोजणी (Vote Counting) सुरु झाली आहे तर काही ठिकाणी सकाळी दहा वाजेपासून मोजणी सुरु होतेय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, स्थानिक पातळीवर भाजप हा आघाडीवरचा पक्ष दिसून येतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्या पाठोपाठ बाजी मारलेली आहे.

सकाळी 10 वाजेच्या सुमारास जवळपास 667 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 167 ग्राम पंचायती मिळवत भाजपाने राज्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात 122 ग्राम पंचायती आल्याचं दिसून येतंय.

तर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात कोण बाजी मारतंय याकडेही सर्वांचं लक्ष आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिंदे गटाच्या ताब्यात 108 ग्रामपंचायती आहेत.

ठाकरे गटाने 75 ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यात यश मिळवलंय.

काँग्रेस पाचव्या स्थानावर असल्याचे दिसून येतेय. 62 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे पॅनल विजयी झाल्याचे चित्र आहे.

आम आदमी पार्टीनेही खाते उघडले आहे. उस्मानाबादेत कावळेवाडी ग्रामपंचायतीत आपचे अजित खोत विजयी झाले आहेत.

कोल्हापूरच्या येरवाड ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षाने खातं उघडलं आहे.

128 ग्रामपंचायतीत अपक्षांनीदेखील बाजी मारल्याचं चित्र आहे.

राज्यभरातील ग्रामपंचायत निकालांमध्ये शिंदे गटाचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस, बच्चू कडू, विश्वजित कदम, राणा जगजित सिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला.

7,751  ग्रामपंचयातींपैकी 590 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.  252 ग्राम पंचायतींवर शिंदे-भाजप गटाचा , 227 ग्रामपंचायतींत महाविकास आघाडीच्या पॅनलचा बिनविरोध विजय झाला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.