AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election : राज्यातला पहिला निकाल हाती, कोल्हापुरात भाजपाचा गुलाल, काय अपडेट्स ?

कागल तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतीत भाजपला विजय मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Gram Panchayat Election : राज्यातला पहिला निकाल हाती, कोल्हापुरात भाजपाचा गुलाल, काय अपडेट्स ?
Image Credit source: social media
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 20, 2022 | 12:00 PM
Share

कोल्हापूरः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे.  आज सकाळीच पहिला निकाल हाती आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत भाजपने (BJP) खातं उघडल्याची बातमी आहे. कागल तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतीत भाजपला विजय मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ गटाला येथे धक्का बसला आहे. समरजित घाटगे यांच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलला विजय मिळाला असून पाच ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.

भाजपने खातं उघडलं…

  • करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपाने बाजी मारली आहे.
  • बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा फडकला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस गटाला धक्का बसला आहे.
  • राज्यातील 7,751  ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यापैकी 590 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे.
  • कोल्हापूरमधील 43, सांगलीत 28, रायगडमध्ये 50, बीडमध्ये 34 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
  • त्यामुळे 7,731 ग्रामपंचायतींचा निकाल पाहणं बाकी आहे.
  • यापैकी भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात 252 ग्रामपंचायती आहेत.
  • पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर सकाळी आठ वाजेपासून राज्यातील विविध भागात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

 ठाकरे गटाने खातं उघडलं

कोल्हापूर जिल्ह्यातील व्हनाळी येथे माजी संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंच पदी विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पॅनलचा इथे दणदणीत विजय झाल्याची माहिती हाती आली आहे.

उस्मानाबादेत पहिला निकाल

उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी ग्रामपंचायतीवर आम आदमी पार्टीचे ऍड अजित खोत विजयी झाल्याची माहिती हाती आली आहे.

इचलकरंजीतील अपडेट्स काय?

इचलकरंजीतील शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल हाती आले आहेत. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट ग्रामपंचायत सरपंच पदाचे उमेदवार  कस्तुरी वसंत कुरुंदवाडे विजयी झाल्या आहेत.. महाविकास आघाडीच्या उमेदवार येथे विजयी झाले आहेत.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?