AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी पद न मिळाल्याने पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही : अनिल बाबर

"पद मिळाले नाही म्हणून मी पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही", असं वक्तव्य शिवसेनेचे विटा खानपूरचे आमदार अनिल बाबर (Shivsena mla Anil Babar) यांनी केलं आहे.

मी पद न मिळाल्याने पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही : अनिल बाबर
| Edited By: | Updated on: Jan 04, 2020 | 6:43 PM
Share

सांगली : “पद मिळाले नाही म्हणून मी पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही”, असं वक्तव्य शिवसेनेचे विटा खानपूरचे आमदार अनिल बाबर (Shivsena mla Anil Babar) यांनी केलं आहे. अनिल बाबर यांनी आज (4 जानेवारी) कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केलं. सांगलीतील विटा खानापूर येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना (Shivsena mla Anil Babar) कार्यकर्ते उपस्थित होते.

“पद मिळाले नाही म्हणून मी एखादा पक्ष सोडणारा कार्यकर्ता नाही. मी मंत्रिपदासाठी इछुक होतो. पण सत्तेसाठी नाराज होऊन एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणारा कार्यकर्ता नाही. नाराजी ही विकासाच्या दृष्टीने असते. मी नाराज नाही. मंत्रिपद न मिळाल्याने मी पक्ष सोडणार अशीही चर्चा सुरु होती”, असं अनिल बाबर यांनी सांगितले.

“नाराजी आणि माझा संघर्ष राजकारणात कायम असेल. पण संघर्ष आणि नाराजी ही विकास कामासाठी असेल. माझ्या मतदारसंघात एखादे काम मला अपेक्षित आहे ते झालं नाही तर मी निश्चितपणे नाराज होईल. तसेच संघर्ष करेन पण तोही विकासकामांसाठी असेल. कार्यकर्त्यांमधील नाराजी जाण्यास सहा महिने लागतात. त्यामुळे याचा परिणाम विकासकामांवर होतो. हा विचार करुन मी कार्यकर्ता मेळावा बोलवला. मी कार्यकर्त्यांना सांगितले की नाराजी सोडून द्या. वक्त से पहले किस्मत से ज्यादा कुछ ना कुछ मिलता है”, अशी शायरीही अनिल बाबर यांनी म्हटली.

“गेल्या काहीदिवसांपासून अनिल बाबर हे नाराज आहेत, अशी माहित समोर येत होती. मात्र मी नाराज नाही”, असं स्पष्टीकरण खुद्द अनिल बाबर यांनी दिलं.

“सोशल मीडियातून काही चुकीचे मेसेज जाण्याची शक्यता असते. विकासकामाच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य राहावे म्हणून हा मेळावा बोलवला होता. या मेळाव्यामध्ये कुठल्या नाराजीचा प्रश्न नाही”, असं बाबर यांनी सांगितले.

“भविष्यात येणाऱ्या अधिवेशनात मी शिवसेनेचा आहे की इतर कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता जनतेची भूमिका ठामपणे मांडणार आहे. मग शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असो किंवा जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्या मदत करण्याचा विषय असो हे सर्व मुद्दे मी मांडणार आहे”, असंही बाबर यांनी सांगितले.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.