AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, बोंबलून प्रश्न मांडू नका, दमडी न देणाऱ्या केंद्राकडे शिमगा करा : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना जो शब्द मी दिलेला आहे. तो माझा आणि शेतकऱ्यांमधला आहे. तो मी पाळणार आहे. पण आम्ही  तुम्हाला काय करायला लावलं असा आव विरोधीपक्षाने आणायचा प्रयत्न करु नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले

मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, बोंबलून प्रश्न मांडू नका, दमडी न देणाऱ्या केंद्राकडे शिमगा करा : मुख्यमंत्री
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 17, 2019 | 3:01 PM
Share

नागपूर :  विरोधकांच्या गदारोळानंतर दुसऱ्या दिवशीही विधानसभेचं कामकाज तहकूब झालं. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची मदत दिली जात नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. सभागृहात आज प्रचंड राडा झाला. या राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर हल्ला चढवला. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा शब्द देऊन आम्ही सत्तेवर आलो आहे, मी दिलेला शब्द पाळणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Farm Loan, BJP)

शेतकऱ्यांना जो शब्द मी दिलेला आहे. तो माझा आणि शेतकऱ्यांमधला आहे. तो मी पाळणार आहे. पण आम्ही  तुम्हाला काय करायला लावलं असा आव विरोधीपक्षाने आणायचा प्रयत्न करु नये. तुम्हाला जर प्रश्न मांडायचे असतील तर त्याला एक पद्धत आहे. उगाच बोंबलून प्रश्न मांडता येत नाहीत. आमचं उत्तर न ऐकता बोंबलत बसलात तर जनतेसमोर तुमचा कांगावा उघड होतो आहे. लोकांसमोर तुमचंच बिंग फुटतंय. म्हणून माझी आताच्या विरोधी पक्षांना आणि पूर्वीच्या मित्रपक्षांना विनंती आहे की योग्य मार्गे भूमिका मांडा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारचे पहिले अधिवेशन आहे. यापूर्वी मुंबईत जे अधिवेशन झाले त्यावेळी काय घडले हे तुम्हा सर्वांना महित आहे. काल आज घडलेल्या घटनाही जगासमोर गेल्या आहेत. प्रथम मुख्यमंत्री म्हणून माझं आवाहन आहे की सभागृहाला मोठ्या परंपरेचा वारसा लाभलेला आहे. हे वैभव आहे. त्याला काळीमा लागेल असे वर्तन कोणीही करु नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

व्यथा, वेदना मांडा, त्यावर उत्तर घ्या, पण जणू काही आपण एकमेव आहोत आणि समोर सत्ताधाऱ्यांना काहीही पडलेले नाही असे वर्तन निंदाजनक आहे. सभागृहात शेतकऱ्यांबद्दल जो प्रश्न उचलला आहे, त्याबद्दल मी गेली 25 वर्षे मी स्वत: रस्त्यावर उतरलो आहे. पंतप्रधान पीक विमा घोटाळा, शेतकरी सन्मान योजनेतील अपुरी मदत, शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत किंवा कर्जमुक्ती असेल, हे वचन देऊन आम्ही सत्तेवर आलो आहेत. वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो हे लोकांना माहित आहे. त्यामुळे दिलेले वचनं, दिलेला शब्द पाळणारी आम्ही लोक आहोत. याची खात्री त्यांना आता पटली आहे. जणू आपण हे करण्यासाठी सरकारला भाग पाडलं असा अविर्भाव आणला जात आहे. हे लोकांना कळतं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘जे सामना बघत नव्हेत, ते मोठा करुन दाखवत होते’

आज आणखी एक आश्चर्य म्हणजे जे ‘सामना’ बघत नाही, वाचत नाही, असे म्हणणाऱ्यांना स्वत:च सामना मोठा करुन दाखवावा लागला. याला म्हणतात हा नियतीचा खेळ आहे. कालाय तस्मै नम:, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लगावला.

‘सामना’ आधीच वाचला असता तर यांच्यावर ही वेळ आली नसती. तेव्हा सामनाला आणि शिवसेनेला विरोधात गिनती करत होते. मात्र आता त्याच विरोधकांच्या हातात सामना आला आहे. त्यामुळे सामना हा सर्वसामान्यांचे हत्यार आहे. तेव्हा आम्ही जे बोलत होतो, तो सर्वसामन्यांचा आवाज होता. जर तुम्ही तो लक्षात घेतला असता किंवा वाचला असता किंवा चोरून वाचत होतात तो उघडपणे वाचला असतात तर आज हा सामना करायची तुम्हाला वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना किती मदत केली गेली याची आकडेवारी दिली आहे. कोल्हापूर पूर – राज्य सरकारने केंद्राकडे 7 हजार कोटी मागितले आहेत. अवकाळी पावसासाठी केंद्राकडे 7 हजार कोटी मागितले आहेत. जे शेतकऱ्यांसाठी आज सरकारकडे गळा काढत आहेत, त्यांनी जरा तिकडे (केंद्राकडे) जाऊन गळा मोकळा करावा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

केंद्राकडून दमडी नाही, शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावे करा

जे इथे आदळाआपट करतात. त्यांचेच सरकार केंद्रामध्ये आहे. त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत. जे शेतकऱ्यांसाठी आज सरकारकडे गळा काढत आहेत, त्यांनी जरा तिकडे जाऊन गळा मोकळा केला पाहिजे, गळा मोकळा करणाऱ्यांना गोळ्या मी देतो.  पण तिथे केंद्राकडून राज्याकडे येणारी मदत येणे गरजेचे आहे, तो एक पैसाही आलेली नाही. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार हे हाताची घडी घालून बसलेले नाही.  त्यामुळे सरकारकडून 6500 कोटीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पण केंद्राकडून राज्याला जे 15 हजार कोटी परतावा बाकी आहे. ते देत नव्हते. त्या रकमेची मागणी केल्यानंतर सरकार हलू लागले आहे. साडेचार हजारकोटीचा परतावा जीएसटीचा आला. त्यामुळे असे जर सरकर चालायला लागले. तर इथे ठणाणा करुन इथे बोंबाबोंब करुन उपयोग नाही.  शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावे करावा राज्या सरकारच्या नावाने करु नका, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

देशात अस्वस्थतेचे अशांततेचे वातावरण निर्माण केलं जातंय. मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. दिल्लीत घुसून गोळीबार केला. त्यामुळे जालियनवाला बागेचे दिवस परत आले का? तसेच वातावरण परत निर्माण केले जात आहे का? ज्या राज्यात युवक जिथे बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. केंद्र सरकारला सांगतो आहे की युवकांना बिथरवू नका. युवक आपला भावी आधारस्तंभ आहे. शक्ती आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Farm Loan, BJP)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं