फडणवीसांसह महाराष्ट्रातील 3 नेते दिल्लीत, जेपी नड्डांशी खलबतं, कारण काय?

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे 3 बडे नेते आज (8 जानेवारी) दिल्लीत दाखल झालेत.

फडणवीसांसह महाराष्ट्रातील 3 नेते दिल्लीत, जेपी नड्डांशी खलबतं, कारण काय?
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 6:47 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे 3 बडे नेते आज (8 जानेवारी) दिल्लीत दाखल झालेत. यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी खलबतं करत आहेत. त्यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलंय. महाराष्ट्रातील हे नेते जे. पी. नड्डा यांच्यासोबत विविध विषयांवर बैठक करत आहेत. यात स्थानिक निवडणुकीतील पराभवापासून अनेक विषयांवर चर्चा होत आहे (Important meeting of Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Chandrakant Patil with J P Nadda in Delhi).

भाजपच्या दिल्लीतील या बैठकीत स्थानिक निवडणुकांमध्ये पराभव आणि आगामी निवडणुका यावर चर्चा होत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला ताकद देण्यासाठी नवी रणनीती तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येतेय. फडणवीसांनी याशिवाय इतर लोकांच्याही भेटी घेतल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली भेटीबाबत एक ट्विट करत काही मंत्र्यांना भेटल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना वस्त्र मंत्रालयात भेटलो. याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचीही त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.”

दरम्यान, याआधी देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना लस मोफत देण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. फडणवीस यांनी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोना लस मोफत द्यावी, अशी मागणी केली होती. यावर केंद्र सरकार राज्याला निधी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असता फडणवीस यांनी ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब असल्याचं म्हणत टीका केली होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लसी संदर्भात सर्व प्रोटोकॉल केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरवले आहेत. पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे. आमची अपेक्षा अशी आहे की अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केले आहे. महाराष्ट्राने देखील केंद्र सरकारची मदत घ्यावी. किमान गरीब आणि मध्यम वर्गाला ही लस मोफत द्यावी, अशी आमची मागणी आहे.”

“कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रामध्ये बघितले. समाजाच्या अनेक क्षेत्रातून अनेकांनी कामे केली. जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रामध्ये 54 लाख लोकांपर्यंत शिधा वाटप करावे लागेल असं सांगितलं. त्यावर आपण काम केलं. त्यामुळे या गंभीर परिस्थितीत आपण संकटाला तोड देत काम केलं. त्यामध्ये नवदुर्गांनी देखील चांगले काम केले. समाजात जे चांगले काम करतात त्यांचे कौतुक झाले पाहिजे. मी या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन करतो. कोरोना काळात सेवा करणाऱ्या या आई चरणी कोरोना दूर होवो अशी प्रार्थना करतो. या आईची शक्ती घेऊन जोमाने काम करूयात,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

भाजपचं दोन दिवस मॅरेथॉन मंथन, कोअर कमिटीचे बडे नेते हजर, विनोद तावडेंना स्थान नाही

जेव्हा शाह-फडणवीसांनी आमीष दाखवूनही विलासकाकांनी भाजपला नकार दिला…

Important meeting of Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Chandrakant Patil with J P Nadda in Delhi

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.