AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 दिवसात पत्रकारांना काहीच मिळालं नाही, हीच सरकारची अचिव्हमेंट : शरद पवार 

शरद पवारांनी (Sharad Pawar on Thackeray Sarkar achievement) राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

100 दिवसात पत्रकारांना काहीच मिळालं नाही, हीच सरकारची अचिव्हमेंट : शरद पवार 
| Updated on: Mar 11, 2020 | 4:32 PM
Share

मुंबई : “महाराष्ट्रातील सरकार उत्तम काम करत आहे. उद्धव ठाकरे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जात आहेत. हे सरकार (Sharad Pawar on Thackeray Sarkar achievement) पाच वर्ष चालणार आहे.  शंभर दिवसात पत्रकारांना काहीच मिळालं नाही, हीच सरकारची अचिव्हमेंट आहे”, अशी मिश्किल टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar on Thackeray Sarkar achievement) यांनी केली. शरद पवारांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आज आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

काँग्रेसने चौथ्या जागेवर दावा केल्याने आज केवळ शरद पवारांचाच अर्ज दाखल करण्यात आला. फौजिया खान यांचा अर्ज वेटिंगवर ठेवण्यात आला. त्याबाबत पवार म्हणाले, “उद्या सकाळपर्यंत राज्यसभेच्या चौथ्या जागेसंदर्भात निर्णय होईल. एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल”

कमलनाथांवर लोकांना विश्वास

मध्य प्रदेशातील राजकीय आपत्तीबाबत शरद पवार म्हणाले, “मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कर्तत्वावर लोकांना विश्वास आहे. अजूनही चमत्कार होईल असं ऐकण्यात येतंय. मी काँग्रेसवर बोलणार नाही. पण जी संधी द्यायला हवी होती ती द्यायला उशीर झाला. काँग्रेसमध्ये नेतृत्व आहे, भविष्य आहे. महाराष्ट्राचं सरकार हे पाच वर्ष काम करेल”

कोरोनाबाबत काळजी घ्या

शक्यतो जाहीर सभा मेळावे टाळावे अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. मोठे समारंभ, खेळाच्या स्पर्धांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं उपस्थित असतात. आपण घाबरून जाण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.