AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी हीच भाजपची इच्छा : जयंत पाटील

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन भाजपवर गंभीर आरोप केला आहे (Jayant Patil on Devendra Fadnavis).

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी हीच भाजपची इच्छा : जयंत पाटील
| Updated on: Apr 29, 2020 | 8:31 PM
Share

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन भाजपवर गंभीर आरोप केला आहे (Jayant Patil on Devendra Fadnavis). भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असंच वाटत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचाही उल्लेख करत त्यात भाजपचा सूर स्पष्ट होत असल्याचं मत व्यक्त केलं.

जयंत पाटील म्हणाले, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे पत्र दिलं आहे त्यातून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असाच सूर निघतो आहे. हा सूर त्यांचा आणि त्यांचा पक्ष भाजपचा आहे. मात्र, माझ्या दृष्टीने या मुद्द्यांमध्ये अर्थ नाही. राज्यपाल त्यांच्या सुचनेनुसार, विनंतीनुसार आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागतात, असं आमचं अजूनही मत नाही. राज्यपाल स्वतंत्र विचाराचे आहेत. ते निर्भिड आहेत. ते या प्रकरणी निर्भिडपणे निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. कायदा आणि घटना जे सांगते त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने एकदा नाही, तर दोन-दोनवेळा शिफारस केल्यावर ती राज्यपालांनी मान्य करणे हे घटनेच्या चौकटीत बसतं म्हणून आम्ही ती मागणी करतो.”

जयंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कोणत्याही राष्ट्रपतींना, राज्यपालांना संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार नाही. ‘आधी संकट कोरोनाचे, मग मुख्यमंत्रिपदाचे’ असं असायला हवं. आधी आपल्याला कोरोनाच्या संकटावर मात करायची आहे. रेशन कार्ड नाही त्यांच्या धान्याचं काय? निराधार योजनेत 1 हजार रुपये आले नाही त्या अनुदानाचं काय? ज्यांचा रोजगार गेला त्यांचं काय? कोट्यातून विद्यार्थ्यांना आणतो तेव्हा तेंलगणातील मजूरांचं काय, राज्यातील उद्योगधंदे बंद पडले आहेत त्याबद्दल चर्चा नाही. मात्र, आघाडीचे अनेक नेते 28 मे दूर असतानाही केवळ उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरच बोलत आहेत.”

सध्या कॅबिनेटची बैठक जनहिताचे निर्णय घेण्यासाठी होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा निर्णय 20 मेनंतर करता येईल, पण महाविकास आघाडी ज्या पद्धतीने राजकारण करत आहे ते चुकीचं आहे. खुर्ची, पद श्रेष्ठ नाही, या संकटावर मात करण्यासाठी एकमेकांशी चर्चा केली पाहिजे. हे संकट एका पक्षावर किंवा जाती धर्मावर नाही. हे संकट छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर आहे. मात्र, जयंत पाटील राष्ट्रपती राजवटीचा आरोप करत आहे. मला वाटतं राष्ट्रपती राजवट कुणाच्या हाती नाही. या देशात कायद्याच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ शकत नाही, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

अटी-शर्ती पाळून अडकलेल्या मजुरांना समन्वयाने राज्यात न्या, केंद्राचा निर्णय

वसई विरारमध्ये दिवसभरात 5 रुग्णांची कोरोनावर मात, 130 पैकी 46 रुग्ण बरे

कोरोनाच्या संकटात गोंडस मुलीला जन्म, 14 दिवसांच्या उपचारानंतर मायलेकीची भेट

Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?

संबंधित व्हिडीओ:

Jayant Patil on Devendra Fadnavis and Presidential rule in Maharashtra

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....