Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?

24 तासात देशभरात 1,543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 29,435 वर पोहोचला आहे. ही संख्या चिंताजनक आहे.

Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 5:59 PM

मुंबई : देशात कोरोनाचं थैमान सुरुच आहे(Corona Virus Update In India). गेल्या 24 तासात देशभरात 1,543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 29,435 वर पोहोचला आहे. ही संख्या चिंताजनक आहे. यापैकी 6,865 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर देशात सध्या 21,631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात 30 जानेवारीला भारतात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता(Corona Virus Update).

30 जानेवारीपासून ते आजपर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 29,435 वर पोहोचली आहे. तर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे 6 हजार 169 रुग्ण आहेत. मात्र, भारतात एक रुग्ण ते 29,435 कोरोना रुग्ण हा आकडा इतका कसा वाढला. देशात सर्व खबरदारी घेऊनही लॉकडाऊन घोषित करुनही कोरोनाचा कहर भारतात वाढतच गेला, तो कसा आणि किती पटीने वाढला त्याचा हा आढावा.

भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?

किती दिवसांमध्ये किती कोरोनाबाधित रुग्णकालावधी बाधितांची संख्या
45 दिवसात 10030 जानेवारी ते 14 मार्च 102
16 दिवसात 100015 मार्च ते 29 मार्च1,139
11 दिवसात 500030 मार्च ते 9 एप्रिल6,728
11 दिवसात 10,0008 एप्रिल से 19 एप्रिल17,305
9 दिवसात 13,11920 एप्रिल से 28 एप्रिल 30,424

सर्वाधिक कोरोनाबाधित ठरलेले पाच दिवस कोणते?

दिवसकोरोना बाधित
23 एप्रिल 1667
25 एप्रिल 1835
26 एप्रिल 1607
27 एप्रिल 1561
28 एप्रिल 1903

Corona Virus Update In India

सर्वाधिक जीवघेणे ठरलेले 5 दिवस कोणते?

  
23 एप्रिल 44
24 एप्रिल 57
25 एप्रिल 37
26 एप्रिल 60
27 एप्रिल 54
28 एप्रिल 71

एक महिन्यानंतर भारतात 22 हजार कोरोनाबाधित रुग्ण वाढले. चीनमध्ये एक महिन्यानंतर 75 हजाराने, तर इटलीत सव्वा लाखाने कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती.

देश लॉकडाऊनचा पहिला दिवस बाधित/मृत्यूलॉकडाऊनचा 30वा दिवस बाधित/मृत्यू
भारत657 / 1223,039 / 721
चीन830 / 2576,288 / 2,345
इटली9,172 / 4631,35000 / 17,127

देशात 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तर देशातील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आता 22.17 टक्क्यांवर आलं आहे, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

Corona Virus Update In India

संबंधित बातम्या :

आयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा

देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

घराच्या ओढीने तरुणाचा 1700 किमी सायकलने प्रवास, सांगलीहून सात दिवसात ओदिशा गाठलं

पैशांचा तुटवडा, किडनी आणि लिव्हरचे उपचार परवडेना, राहुल गांधी 1,000 रुग्णांची जबाबदारी घेणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.