AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन, ठाण्यात सावित्रीच्या लेकींचा सन्मान

आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे आरक्षण संपवणाऱ्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, अशा शब्दात आव्हाड यांनी केंद्र सरकारविरोधात लढा उभारण्याचं आवाहन केलं.

अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन, ठाण्यात सावित्रीच्या लेकींचा सन्मान
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 5:06 PM
Share

ठाणे : ‘मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने (OBC Community) लढायला हवे होते. पण, त्यावेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. पण, आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज केले.ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड बोलत होते. या प्रसंगी आ. रवींद्र फाटक, आ. निरंजन डावखरे, स्थायी समिती सभापती संजय भोईर, आदी उपस्थित होते.

यावेळी आव्हाड म्हणाले , जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले जर नसते तर आज इथे कोणतीच महिला दिसली नसती. महिला कोणत्याही जातीधर्माची असली तरी ती सुशिक्षित झाली त्याचे श्रेय फक्त आणि फक्त सावित्रीमाई यांनाच जाते. कार्ल मार्क्स याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते जोतिराव फुलेच आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा ओबीसींसाठीच दिला आहे, याची जाणीव तमाम ओबीसींनी ठेवली पाहिजेत. आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे आरक्षण संपवणाऱ्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, अशा शब्दात आव्हाड यांनी केंद्र सरकारविरोधात लढा उभारण्याचं आवाहन केलं.

इम्पिरिकल डेटासाठी राज्य सरकारवर दबाव आणा- डावखरे

तर आमदार निरंजन डावखरे यांनी ओबीसी एकवटू लागले आहेत, हे अत्यंत चांगले आहे. पण, राज्याने इम्पिरिकल डाटा सादर करून ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन केले. तर, ओबीसी नेतृत्व अशोक वैती यांनी, एका कार्यक्रमापुरते मर्यादित राहू नये. ठाणे ओबीसी एकीकरण समितीने यापुढेही नियमित एकत्र येणे गरजेचे आहे. जर आपण एकत्र आलो तरच ओबीसींची बिगर राजकीय ताकद उभी राहिल, असं सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिनल पालांडे , डाॅ. अर्चना पवार, प्रा. नलिनी कुडूक, आरती प्रधान, श्रृतीका महाडीक, शितल खरटमल, वर्षा मटकर, जयश्री रामाणे, प्रज्ञा गायकवाड, संगीता बामणे, विमल तांबे, कन्या खानविलकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या :

पुण्यात तूर्तास शाळा बंदचा निर्णय नाही, पालकमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर नवी नियमावली, महापौरांकडून स्पष्ट

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, किती तारखेपर्यंत बंद राहणार शाळा? वाचा सविस्तर

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.