AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो’ रस्ता 106 वर्षांपूर्वीचा, तरीदेखील खासगी कंपनीला 74 कोटींची भरपाई देण्याचा घाट, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आणखी एका भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे (Kirit Somaiya allegation on Thackeray Government).

'तो' रस्ता 106 वर्षांपूर्वीचा, तरीदेखील खासगी कंपनीला 74 कोटींची भरपाई देण्याचा घाट, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
| Updated on: Dec 11, 2020 | 6:32 PM
Share

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आणखी एका भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. “अंधेरीत महाकाली लेणीजवळ 106 वर्षांपूर्वी रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील या रस्त्याच्या बदल्यात उद्योगपती विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या कंपनीला 74 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा घाट घातला जात आहे. हा एक मोठा घोटाळा आहे”, असा दावा त्यांनी केला (Kirit Somaiya allegation on Thackeray Government).

किरीट सोमय्या यांनी आज (11 डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बिल्डर आणि मुंबई महापालिकेच्या संगमताने भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला. “अंधेरीत महाकाली लेणी आहे. हा भाग पुरातत्व विभागाशी संबधित असल्याने हा भाग केंद्र सरकारच्या मालकीचा आहे. मुख्य म्हणजे लेणी आधी पासून आहे. यामुळे 1914 सालात याठिकाणी रस्ता बनवण्यात आला. त्यावेळी ही जागा मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीतही नव्हती”, असं किरीट सोमय्या म्हणाले (Kirit Somaiya allegation on Thackeray Government).

“या परिसरात कमाल अमरोही स्टुडिओ होता. हा स्टुडिओ 2014 सालात महाल फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीने विकत घेतला. या कंपनीत विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले भागीदार आहेत. या कंपनीने रस्त्याच्या बदल्यात टीडीआर मागितला होता. त्याला महानगरपालिकेने नकार दिला होता. आता सत्तांतर झाल्यावर पुन्हा त्या कंपनीने टीडीआर ऐवजी त्याचे 74 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली. जो रस्ता 100 वर्षांपासून आहे, ज्याची मालकी केंद्र सरकारची आहे त्याचे पैसे या महाल फीचर्स कंपनीला देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. हा भ्रष्टाचार आहे”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी याआधीदेखील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी केला होता. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.

हेही वाचा : रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा, अर्णव गोस्वामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.