AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाल कुणाचा? राज्यातील ग्रामपंचायत निडणुकीत शिंदे आणि ठाकरे गटाचे निकाल काय?; वाचा सविस्तर

नागपुरात काँग्रेसने खातं खोललं आहे. नागपुराताली अंभोरा ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. या ठिकाणी राजू कुकडे हे सरपंचपदी निवडून आले आहेत.

गुलाल कुणाचा? राज्यातील ग्रामपंचायत निडणुकीत शिंदे आणि ठाकरे गटाचे निकाल काय?; वाचा सविस्तर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2022 | 10:54 AM
Share

नंदूरबार: ग्रामंपचांयातीच्या निवडणुकीचे (Gram Panchayat Election) निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपने (bjp) आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीची कामगिरीही चांगली होताना दिसत आहे. नंदूरबारमध्ये भाजपने चांगली कामगिरी करत 5 ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. तर काँग्रेसनेही (congress) 6 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. नंदूरबार जिल्ह्यात भाजपचा मंत्री असतानाही भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर दिसत आहे. तर शिंदे गट आणि ठाकरे गटानेही राज्यातील ग्रामपंचायतीत चांगली कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे.

नंदूरबारमध्ये भाजपने आतापर्यंत 5 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. काँग्रेसने 6, आणि ठाकरे गटाने 1 ग्रामपंचायत जिंकली आहे. डॉ. विजयकुमार गावित हे भाजपमध्ये आले होते. त्यांना भाजपने मंत्रीपद दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढताना दिसत आहे. काँग्रेसचीही ताकद अजूनही कमी झाली नसल्याचं या निकालातून स्पष्ट होत आहे. कोरोना नंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होत आहे. पहिल्या टप्प्यात चांगली परिस्थिती होती. दुसऱ्या टप्प्यातही निकाल चांगले लागताना दिसत आहे.

राज्यातील 1165 ग्रामंपचायतीचे निकाल लागत आहेत. यापैकी 100 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी भाजपने 23, शिंदे गटाने 14, ठाकरे गटाने 15, काँग्रेसने 9 आणि राष्ट्रवादीने 17 तर इतरांनी 22 जागा जिंकल्या आहेत. भिवंडीत मनसेने खाते खोलले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असली तरी आघाडी आणि युतीचे निकाल पाहिल्यास आघाडीने चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे. भाजप युतीला आतापर्यंत 37 तर महाविकास आघाडीला 41 जागा मिळाल्या आहेत.

नागपुरात काँग्रेसने खातं खोललं आहे. नागपुराताली अंभोरा ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. या ठिकाणी राजू कुकडे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. तर नाशिकच्या उंपरपाड्यात विकास आघाडीचा सरपंच झाला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.