AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! कुणाला किती आर्थिक साहाय्य? जाणून घ्या!

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लम्पीमुळे आजारामुळे शेकडो जनावांचा मृत्यू, अखेर सरकारकडून मदतीची घोषणा

लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! कुणाला किती आर्थिक साहाय्य? जाणून घ्या!
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 8:51 AM
Share

हिरा ढाकणे, TV9 मराठी, प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Agriculture News) लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान झालंय. एकीकडे जनावरं आजारी पडून दगावत आहेत. तर दुसरीकडे त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर जनावरं दगावल्याने आर्थिक संकट ओढवलंय. अशातच आता राज्य सरकारनं (State Government) शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी (12 ऑक्टोबर, 2022) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

कुणाला किती अर्थसहाय्य?

दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला 30 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपयांचं आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या 16 हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे.

मृत पावलेल्या पशुधनाचा प्रकारअर्थसहाय्य (प्रति जनावर)
दुधाळ जनावरं (गाय)रुपये 30,000/-
ओढकाम करणारी जनावरं (बैल)रुपये 25,000/-
वासरंरुपये 16,000/-

शिंदे-फडणवीस सरकारकडून कडून मदतीचा शासन आदेश बुधवारी जारी करण्यात आलाय. 4 ऑगस्टपासून ज्यांची जनावरं लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

पाहा स्पेशल रिपोर्ट

काय असणार निकष?

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे ही मदत जाहीर करण्यात आली आहे. अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य मिळावं, या अनुषंगाने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे.

मृत पशुधनाच्या संख्येवरील निर्बंधांचे निकष सुद्धा ही मदत देताना शिथील करण्यात येणार आहेत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी, पशुपालक यांच्याकडे असलेल्या पशुधनाचा मृत्यू झाला, अशा सर्व शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आलेत. या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.